मन निर्भय कसे बनवावे

May 4, 2025 | Uncategorized

Share

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा आहे.. पहा जर प्रामाणिक पणे विचारला तर उत्तर काही प्रमाणात हा येईल .. काही प्रमाणात नाही येईल.. आता निर्भयता म्हणजे काय ? आपल्या मनात असणारी भीती दूर करणे.. आता नेमकी भीती कशा कशाची असू शकते किंवा असते.. मला अपयश येईल का ? कोणतेही काम करण्या पूर्वी हि मनांत भीती निर्माण होते.. मी जर एखादे चांगले काम केले आणि त्यात अपयश आले तर लोक काय म्हणतील.. मी एकटाच आहे मी हे काम कसे करू… माझे भविष्यात कसे होईल .. मी एखादे काम करताना पडेल का.. अश्या अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्या मनात भीती असते.. मग हीच भीती आपल्या मनात बसते.. आपले मन भीतीने ग्रस्त होते.. मग आपण अपयशी होतो.. अनेकदा आपण स्वामी सेवा हि करत असतो पण तरी आपल्या मनात असणारी भीती मुळे आपली सेवा सुद्धा यांत्रिक होते.. मग कधी अपयश आले कि मन म्हणते मी इतकी सेवा करतो .. असे करतो तसे करतो पण तरी मी अपयशी होतो.. आता पहा खरंतर स्वामी आपणस निर्भयता हा गुण विकसित करण्यास सांगत आहेत .. जिथे निर्भयता तिथे यश.. आता इथे एक गोष्ट आपणस सांगावीशी वाटते ती म्हणजे निर्भयता म्हणजे लोकांवर अन्याय करणे नव्हे .. आता हा निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी काय करावे यावर आपण चिंतना करू.. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणा हा गुण विकसित करावा.. अपयश जरी आले तरी मी त्यातुन शिकणार आहे.. निर्भयता येण्यासाठी जे काही चरित्र असतील ते वाचाव्यात .. त्या चरित्रावर पुन्हा मनात चिंतन मनन करावे.. नेमके आपल्या मनात जी भीती आहे ती का आहे.. त्या भीतीच्या मुळावर काम करावे.. जसे मनात भीती आहे मी चुकलो तर.. मग विचार करा मी जरी चुकलो तरी त्या चुकेवर चिंतन मनन करून जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मी यशस्वी होईलच.. रोज थोडा वेळ स्वामी नाम घ्या.. थोडावेळ ५ मिनिटे ध्यान करा.. स्वामींना प्रार्थना करा .. मला निर्भय बनव.. निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी मला मदत करा.. पहा रोजच्या सरावाने आपल्यातील मनांतील भीती दूर होईल.. आपल मन निर्भय होईल.. मग यश आपले दार ठोठावेल.. पहा आपणही यावर चिंतन मनन करावे आणि स्वामी सेवा आणि निर्भय मनाने यशाला गवसणी घालावी.. धन्यवाद स्वामी .. कोटी धन्यवाद .. हि सेवा करून घेतल्या बद्दल धन्यवाद

www.chetankeswar.com


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......