देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.
देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत?

देवघर – आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे कसे असावे.. खरंतर याचा उत्तर आपण अनेकांची अनेक मत यावर असतात.. मग खरंच प्रश्न निर्माण होतो कि कोणते उत्तर खरे चला आज आजच्या कालानुरूप देव घराचा विचार करू… शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा (ईशान कोपरा) असावे.. पर्यायी दिशा (जर ईशान्य शक्य नसेल तर) पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहेत.. आता हे झाले घरात कुठे असावे याचे उत्तर आता कसे असावे.. याचे साधे आणि सोपे उत्तर आपणस आर्थिक दृष्ट्या परवडणारे.. ज्या देव घरासमोर बसले कि आपले मन शांत होईल असे देव घर असावे.. अनेकदा सांगितले जाते असेच हवे.. तसे नको..पण इथे महत्वाचा विषय आहे.. आपणस आर्थिक दृष्ट्या काय शक्य आहे.. आणि आपल्या मनाला शांती मिळते कि नाही… देवघरात देव कोणते असावेत.. गणपती..कुलदेवी .. कुल देवता टाक .. अन्नपूर्णा .. बाळकृष्ण.. शंख .. घंटा.. इतकेच देव देवघरात असावेत.. आता आपल्या कडे इतरही मूर्ती असतील तर चालतील.. पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा.. अनेकदा काय होते आपण कुठे देवाला गेलो कि मूर्ती आणतो.. फोटो आणतो.. हे शक्य तो टाळा.. कारण काय तर आपणासही देव पूजा करताना सोपे राहील.. आता अनेकदा काय होते काही लोक आपणस सांगतात कि हि मूर्ती नको.. हे देव घरात नको.. आता याबाबत आपणस योग्य तो निर्णय आपण घ्यावा पण एक गोष्ट नक्कीच मनाला खटकते कि कुणी तर सांगते म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो.. ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो.. हे कुठंतरी मनाला पटत नाही.. त्यामुळे हि गोष्ट करताना जे आपणस सल्ला देत आहेत त्यांना योग्य सोलुशन द्याल सांगा.. शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे कि देव घर असे बनवा कि आपल्याला प्रसन्न वाटेल.. आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल.. शेवटी देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर देव आहे चराचरात आहे.. देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देव घर पाहून झाली पाहिजे.. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे विचारा नक्कीच आपण त्यावर विडिओ बनवूया.. धन्यवाद

 

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.
हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.
म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा.
हा काळ तुमच्या उत्कर्षाचा आहे — तो तुमचं कल्याणच करणार आहे.

स्वामी भक्त हो आपण आपल्या चॅनल वर आपले प्रश्न जे आहेत त्यावर चिंतन मनन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याचा उपयोग सर्वांना होणार आहे त्यामुळे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कंमेंट मध्ये मांडू शकता आपण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.. सर्वप्रथम आपले चॅनेल लाईक share आणि सुब्स्क्रिब करा.. आजचा आपला विषय आहे साडेसाती म्हणजे काय ? साडेसाती मध्ये काय करावे.. चला तर मग सुरवात करूया.. साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीवरून साडे-सात वर्षांचा प्रवास (7.5 वर्षे).
यात शनी तीन राशींमध्ये भ्रमण करतो:जन्मराशीच्या आधीची रास (२.५ वर्षे) जन्मराशी (२.५ वर्षे) जन्मराशी नंतरची रास (२.५ वर्षे) म्हणजे एकूण २.५ + २.५ + २.५ = ७.५ वर्षे → म्हणून नाव “साडेसाती”.साडेसाती तेव्हा सुरू होते, जेव्हा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो.
उदा. — जर एखाद्याची जन्मराशी “मकर” असेल, तर शनी धनु राशीत आला की साडेसाती सुरू होते आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर संपते.अनेक लोक साडेसाती आली कि घाबरतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देतात.. पण हा काळ आपल्या उत्कर्षाचा काळ असतो.. शनी देव हे आपल्या कर्माचा हिशोब पाहतात पहा चांगले कर्म असेल तर चांगले फळच मिळेल.. म्हणजेच साडेसाती हा शब्द आपणस सदैव चांगले कर्मच करण्याचा उपदेश करत आहे नाही तर आपण वाईट अश्या परिणामांना सामोरे जावे लागते… म्हणजेच साडेसाती हा आपल्या कर्माचा आरसा आहे.. आता अनेकांना साडेसाती मध्ये दुःख यातना भोगाव्या लागतात पण याच साडेसाती मध्ये आपला उत्कर्ष होत असतो.. पण त्या आपल्याला हि समज असणे आवश्यक आहे कि हि साडेसाती माझे कल्याणच करणार आहे.. हा विश्वास .. श्रद्धा असली पाहिजे.. पहा एखादी गोष्ट वाईट म्हंटल कि आपले वाईटच होते.. जसे आपले विचार तसे आपले जीवन.. साडेसाती मध्ये मन घाबरते खरंतर मनाला सांगा आता तर माझा चांगला काल सुरु झाला आहे.. हो थोडे कष्ट यातना होत आहेत पण या काही वेळे नंतर मला सुखी करणार आहेत.. मला माझ्यात बदल करणे आवश्कयक असेल तो बदल करावा लागेल.. हि तर माझ्या चांगल्या आयुषची सुरवात आहे.. आता मी थांबणार नाही तर लढणार आहेकारण शनिदेव हे माझे कल्याणच करणार आहेत.. आता यात काय करावे.. सर्वप्रथम आपले विचार वर काम करा ते सकारात्मक बनवा.. त्या साठी चांगले पुस्तक वाचा.. शनी देवाला प्रार्थना करा.. शनी मंत्र म्हणा.. मनाला सांगा हा माझ्या उत्कर्षाचा काळ आहे.. जे काही घडतंय, ते माझ्या विकासासाठी घडतंय.” शनी महाराज माझे शत्रू नाहीत तर ते माझे कल्याण करणारे आहेत.. ते माझे उत्कर्ष करत आहेत.. पहा एक विचार किती फरक पडतो.. पहा नक्कीच मार्ग सापडू लागेल.. आज इथे थांबू पुन्हा भेटू नवीन प्रश्न आणि त्यावरील चितनं मनन घेऊन तो पर्यत आपले काही प्रश्न असतील तर पाठवा..द धन्यवाद

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो…आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो…निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक…म्हणजे मनात शंका नको…पहा..आपले मन शंका निर्माण करतेच…माझे अमूक काम होईल का? नाही होणार…होईल…मन म्हणते होईल…मध्येच म्हणते नाही होणार…मग आता इथे आपल्याला…पहिले काम करावे लागेल ते आपल्या मनावर..मग आता मनावर कार्य कसे करणार…आता या बाबत आपण अनेक उपाय वापरू शकतो…पहा आपल्या घरात भांडी असतात…जी भांडी आपण वापरतो ती रोज आपण धुतो…जी वापरत नाही ती आपण धूत नाही त्या भांड्यावर घाण..धूळ जमा होते…म्हणजेच काय आपणास भांडे जसे स्वच्छ करतो..तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणे आवश्यक आहे…आता आपल्याला मन स्वच्छ करायचे आहे…याला उपाय आहे स्वामी नाम..रोज स्वामी नाम घ्यावे…आता..मनात येईल की आपण इतक्या काळा पासून स्वामी नाम घेत आहोत…पण मन निःशंक होत नाही…पहा आपणास हे कार्य अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे…आता स्वामी नाम तर घेतले…दुसरे कार्य आपणास कार्य करायचे आहे…प्रार्थना..स्वामीना प्रार्थना करायची आहे…स्वामी आमचे मन निःशंक करा…हे आम्ही करू शकता नाही. हे आपल्या कृपेनेच शक्य आहे…तिसरे कार्य आपणास करणे आवश्यक आहे…रोज आपणास स्वामी लीला असतील किंवा जे काही सकारात्मक असेल त्याचे वाचन करायचे आहे…आता नुसते वाचन करुन आपणास थांबायचे नाही तर…नेमके आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो यावर आपणास कार्य करायचे आहे… यावर आपणास स्वतः चिंतन मनन करावे लागेल…हे जेव्हा आपण अखंड करू तेव्हा नक्कीच आपले मन निःशंक होईल आणि स्वामी कृपेने स्वामी चरणी निःशंक होईल…धन्यवाद स्वामी..कोटी कोटी धन्यवाद…!
www.chetnakeswar.com

शिव लिंग पूजन के लिए कैसा शिव लिंग हो

 

सर्वप्रथम महादेवजी के लिंग का पूजन श्री ब्रम्हदेव और विष्णु देव इन्होने किया वह दिन महाशिवरात्रि का दिन था.. इनकी पूजा से महादेव जी प्रसन्न हुवे और उन्होंने यह वर दिया की इस दिन जो भी कोई शिव पूजन करेंगे उन्हें पुरे साल सेवा करने का फल प्राप्त होगा..शिव पुराण कथा में पार्थिव शिव लिंग पूजन को अनन्य साधारण ऐसा महत्त्व है.. बहोत बार हमारे मन प्रश्न निर्माण होता है की ऐसा ही शिव लिंग हो.. इसी धातु का हो.. ऐसा न हो… लेकिन शिव महा पुराण हमें बताता है की सभी ने पार्थिव शिव लिंग का पूजन करना चाहिए..अब शिव महा पुराण में अनेक मंत्रो से इसका निर्माण कर सकते है ऐसा आता है.. लेकिन अगर हमको कुछ भी मालूम न हो तो हम ॐ नमः शिवाय इस मंत्र जपते जपते इसका निर्माण कर सकते है.. उसी तरह शिव पूजन के लिए यही मंत्र का जाप करने का विधान शिव पुराण करता है.. इसलिए हमें कम से हर रोज एक माला या ११ माला ॐ नमः शिवाय का जाप करना चाहिए… शिव पुराण कथा में अन्न का महत्व अनन्य साधारण ऐसा है… इसलिए हमें जैसे हो सके वैसे भूखे आदमी को अन्न दान करना चाहिए… इस तरह हमें अपने जीवन में शिवजी का पूजन करना है और अपना जीवन सफल बनाना है.. बोलो उमा महेश्वर देवता की जय.. ॐ नमः शिवाय !!

शिव पुराण कथा 6

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे…आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग किंवा शिव मूर्ती मध्ये काय फरक…शिव पुराण कथा सांगते…भगवान शिव हे ब्रह्मरूप आहेत..त्यामुळे त्यांना निष्कल म्हणजे निराकार आहेत..म्हणून शिव लिंग हे निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे..तसेच शिव हे साकार ही आहेत म्हणून आपण मूर्ती पुजा ही करू शकतो…आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की साधारण मूर्ती किंवा पिंड कशी असावी याबाबत..शिव महापुरान कथा सांगते आपल्या आर्थिक पात्रते नुसार आपण ही घ्यावी…आता पुजा कशी करावी..याबाबत ही वर्णन शिव पुराण कथेत येते..त्यात महत्वाचे भक्ती भाव ठेवून पुजन करावें यांचा उल्लेख येतो…बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – खरंतर शिव पुराण आपणस शिव भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन करते.. पहा अनेकदा आपल्या मनात आज पर्यंत प्रश्न निर्माण झाला असेल कि शिव पिंड किंवा मूर्ती यात फरक काय याचे उत्तर आपणास आजची शिव पुराण कथा देत आहे.. महादेव कसे आहेत.. निर्गुण निराकार आहेत.. म्हणून पिंडीची पूजा केली जाते.. आपण कुठेही असाल तरी सहज मातीची पिंड तयार करू शकता.. म्हणजेच सेवा करताना अडचण नसते फक्त आपली तयारी असावी.. आता आपल्या मनात देवा विषयी एक चित्र तयार असते.. आणि आपले मन देवाचे हि चित्र निर्माण करते.. महादेव म्हणजे असे दिसतात.. मग त्या साठी आपण मूर्ती पूजा करू शकतो असे शिव महा पुराण सांगते.. थोडक्यात सेवेचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.. फक्त आपली सेवा करण्याची तयारी हवी बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा आजच्या लीलेस निमित्त करून तू आम्हाला तुझ्या साकार आणि निराकार रूपा बद्दल समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या तुझ्या निराकार स्वरूपाची सेवा करून घे.. आमच्या मनातील सर्व किंतु परंतु दूर कर.. धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ