स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले आणि कृष्णाजी पाटील यांना म्हणाले आम्ही अनेक तीर्थ यात्रा करून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रम्हगिरी सुद्धा आहेत.. आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत आमची सेवा करावी..आपण त्या महाराजांची सेवा करता अहो त्या पेक्षा आमची सेवा करा.. त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाजी एवढेच म्हणाले कि आज तर आमच्याकडे भाकरी आहेत त्याचा स्वीकार करा उद्या शिरा पुरी देऊ..संध्याकाळी ब्रम्हगिरी बुवा नी प्रवचन सुरु केले अनेक वस्ती वरचे लोक प्रवचन ऐकण्यास आले होते.. त्यांनी प्रवचनास भगवद गीतेचा श्लोक घेतला ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ त्यावर निरूपण करू लागले.. त्यांचे निरूपण ऐकून लोकांना काही समजत नव्हते कि महाराज काय सांगत आहेत.. त्या मुळे सर्व लोक उठून श्री गजानन महाराजांकडे गेले.. हे सर्व पाहून गोसाव्याला राग आला.. तेव्हा श्री महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते.. अचानक चिलिम मधील एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंगानी पेट घेतला.. हे सर्व पाहून तेथील लोक घाबरले आणि श्री महाराजांना खाली उतरण्याची विनवणी करू लागले.. भास्कर पाटील पाणी आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा महाराज म्हणाले अजिबात पाणी आणू नकोस.. हा सर्व प्रकार ब्रम्हगिरी सुद्धा पहात होते.. तेव्हा महाराज म्हणाले ब्रम्हगिरी महाराज या बसा माझ्या शेजारी पलंगावर बसा..आताच तुम्ही सांगितले ना.. ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ श्री महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले जा घेऊन या बुवांना या पलंगावर..हे ऐकून बुवा घाबरले आणि पळून जाऊ लागले पण भास्कर पाटील यांनी त्याला पकडले आणि महाराजांकडे घेऊन आले.. महाराज त्यांना म्हणाले अहो आपण जो श्लोक सांगितले त्यावर जे विवेचन केले ते कृतीतून करून दाखवा..बसा या पलंगावर.. तेव्हा बुवा म्हणाले महाराज मला माफ करा.. मी पोट भरू संत आहे.. शिरा पुरी खाण्यासाठी मी संत झालो आहे..लोकांनी महाराजांना विनंती केली आपण खाली उतरा.. महाराज उतरे पर्यंत सर्व पलंग जळून गेला होता केवळ महाराज बसले होते तेवढा भाग मात्र चांगला होता.. ब्रम्हगिरी बुवा महाराजांच्या चरणी लीन झाले.. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला.. जर आपणस स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये.. बुवाला आपली चूक समजली तो.. महारांजाच्या चरणी लीन झाला.. अश्या रीतीने ब्रहागिरी बुवा विरक्त झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

बोध- वरील लीलेतून महाराज आपणस खूप खोल असे मार्गदर्शन करत आहे.. पहा अनेकदा आपणस एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसताना आपण असे दाखवतो कि मला खूप माहिती आहे.. हि गोष्ट अध्यात्म अनेकदा घडते..आपणस या गोष्टी पासून दूर राहायचे आहे.. तसेच आज आपण पाहतो कि अनेक जण अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आपणस असे वाटते कि हा बरोबर तो चूक.. खरंतर आपणस कुणा वर टीका करायची नाही पण आपणस जागृत राहून ईश्वर सेवा करायची आहे.. कारण अनेक ब्रह्मगिरी बुवा आहेत.. आपणस श्री महाराजांची लीला आपल्या जीवनसाठी मार्ग दर्शन करत आहेत.. अनेकदा आपले असे होते कि बुवा प्रमाणे आपणास अनेक स्तोत्र मंत्र पाठ असतात.. आपल्यात अहंकार निर्माण होतो.. खरंतरं जो पर्यंत आपली आंतरिक शुद्धी होत नाही तो पर्यंत आपणास खरे ज्ञान मिळू शकत नाही.. त्या मुळे आपणस अनेक गोष्टी मध्ये न अडकता.. सहज सोपी साधना करायची आहे.. जसे रोज नाम जप करा.. शक्य असेल तर रोज एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ वाचा.. आणि नुसता ग्रंथ न वाचता.. श्री महाराजांना प्रार्थना करा आम्हाला मार्गदर्शन करा.. पहा ज्या प्रमाणे बुवांना मार्गदर्शन मिळाले तसे आपणस हि मिळावे.. हाच बोध होतो.. बोला श्री गजानन महाराज कि जय.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया.. श्री महाराज ज्या प्रमाणे आपण ब्रम्हगिरी बुवाना योग्य मार्ग दाखवला.. आणि सत्याचे ज्ञान प्रदान केले.. असे ज्ञान आम्हाला प्रदान करा.. आम्हाला ज्ञानी नाही तर समर्पित भक्त बनवा.. आम्हाला इतर गोष्टीत न अडकण्याची बुद्धी द्या.. आपल्या नाम सेवेची सेवा द्या..बाकी काहीच नको.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

www.chetanakeswar.com

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका

खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं मोठ्याने मंत्र म्हणू लागले जेणे करून श्री महाराज उठतील.. मंत्र म्हणत असताना ते अनेक चुका करत होते.. गजानन महाराज उठले आणि त्यांना म्हणाले अहो.. अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका.. अरे उगाचच भोळ्या भक्तांचा फायदा घेऊ नका.. महाराजांनी शुद्ध स्वरात मंत्र म्हणून दाखवले.. महाराजांचे मंत्र ऐकून त्या सर्वांना आश्चर्य वाटले.. त्यांना समजले कि महाराज हे कुणी साधारण व्यक्ती नसून.. विधातच आहेत.. हे सर्व जण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.. महाराजांनी हि त्यांना आशीर्वाद दिला..महाराजानी खडूं पाटलांना त्या ब्राह्मणांना १-१ रुपये दक्षिणा देण्यास सांगितली.. त्यानंतर ते ब्राम्हण तिथून दुसऱ्या गावी निघून गेले.. बोला श्री गजानन महाराज कि जय .
बोध – अध्यात्म हे पोट भरण्याचे साधन नसून.. ती ईश्र्वराच्या जवळ जाण्याचा.. त्याची अभिव्यक्ती करण्याचे माध्यम आहे

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार दिला.. हा नकार ऐकताच त्यांना फार राग आला आणि त्यांनी त्या नोकराला मारले इतके मारले कि तो बेशुद्धच पडला.. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून देशमुखांकडे नेले.. देशमुखाने पाटलांच्या विरोधात फिर्याद नोंदवली.. आता मात्र पाटील घाबरले.. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते.. तेव्हा ते श्री महाराजा कडे आले.. महाराजांना सर्व हकीगत सांगितले.. महाराज म्हणाले अरे.. आधी विचार केला नाहीस.. आपण दोघेही समंजस आहात तरी एकमेकांशी भांडता.. लोकांनी आपल्या कडून काय घ्यावे.. महाराजांचे हे बोलणे ऐकून खंडू पाटील यांना आपली चुक समजली.. त्याचा त्यांना पश्चात होत होता.. महाराज म्हणाले काळजी करू नकोस काही होणार नाही.. महाराजांच्या वाणी प्रमाणे खंडू पाटील यांची फिर्यादी तुन सुटका झाली.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – अनेकदा आपण रागाच्या भरात चुकीचे काम करतो.. कुणाला काही तरी बोलतो.. आपणस आपली चूक नंतर कळते.. पण नंतर पश्चाताप करून काय उपयोग.. त्या ऐवजी नेहमी कर्म करताना.. कोणतीही प्रतिक्रिया देताना ती एकदम रागात न देता शांतपणे द्यावी..!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या दर्शनाला जातोस त्यांना प्रार्थना कर आमच्या घरी संतती होऊ दे.. कारण पाटील घराण्यात संतति नव्हती.. कुकाजीच्या म्हणण्याप्रमाणे श्री खंडू पाटील श्री महाराजांना प्रार्थना करतात कि आम्हाला संतती प्राप्ती व्हावी.. यावर श्री महाराज हसतात आणि म्हणतात अरे तुम्ही तर पाटील ना मग हि गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज प्राप्त करता आली पाहिजे..खंडू पाटील नम्रतेने म्हणतात महाराज जसे पीक हे पाण्याशिवाय येत नाही पण पाऊस पाडणे मनुष्याच्या हाती नाही.. तसेच हीही गोष्ट ईश्वरी इच्छे शिवाय शकय नाही.. महाराज हसतात आणि म्हणतात नक्कीच मी ईश्वराला प्रार्थना करतो कि तुला संतती व्हावी.. फक्त एवढेच कर संतती झाली कि आमरसाचे भोजन सर्वांना दे.. काही दिवसांनी आनंदाची बातमी कानी पडली.. गंगाबाई यांना दिवस गेले.. नवमास पूर्ण झाल्यावर त्यांना संतती झाली.. त्याचे नाव त्यांनी भिकू ठेवले.. पाटील घराणे आनंदी झाले त्यांनी अनेक दानधर्म केले.. तसेच आमरसाचे भोजन हि दिलें.. आजही हि प्रथा सुरु आहे असा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथांत येतो..बोला श्री गजानन महाराज कि जय … !

बोध – आपण सर्व काही प्राप्त करु शकतो परंतु आपण कर्ता नाही तर कर्म करण्यास निमित्त आहोत… कर्म प्रामाणिक करा.. ईश्वराच्या इच्छेने आपणस सर्व काही मिळणारच आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो

हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले ) हे पाहून त्यांचे चारही बंधूना आश्चर्य वाटले.. त्यांनी हरी पाटील ला समजावून सांगितले तू जे करत आहे ते चुकीचे आहे.. आपण पाटील आहोत.. लोक आपले ऐकतात आणि आपण त्या महाराजांची सेवा करता.. हे चारही भाऊ उसाची मुळी घेऊन मंदिरात गेले आणि श्री महाराजांना म्हणतात.. ऊस खाणार का ? जर आपण ऊस खाणार असाल तर आमची एक अट आहे ती जर आपणस मान्य असेल तर आम्ही आपणस ऊस देतो.. आम्ही तुम्हाला उसाने मारणार जर तुमच्या अंगावर एकही वण उठला नाही तरच आम्ही आपणस योगी मानू.. महाराज काहीच बोलले नाही.. त्यातील एक भाऊ म्हणाला महाराज काही बोलत नाही म्हणजेच ते घाबरले आहेत असे मारुती म्हणाल.. तर दुसरा भाऊ गणपती म्हणतो अरे त्यांचे मौन आहे याचा अर्थ त्यांची संमती आहे..ते सर्व जण महाराजांना मारण्यासाठी आले.. हे सर्व पाहून बाकी सर्व सेवेकरी पळून गेली पण भास्कर पाटील मात्र तिथेच थांबले आणि त्या चौघांना सांगत होते.. अरे अशी चूक करू नका.. मात्र ते चौघे मात्र ऐकण्यास तयार नव्हते.. ते मारत होते महाराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते..त्यांनी इतके मारले मात्र महाराजांच्या शरीरावर एक हि वण नव्हता.. हे पाहून ते चौघे घाबरली आणि श्री महाराजांच्या चरणी लीन झाले.. महाराज त्यांना म्हणतात बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो.. श्री महाराजांनी हाताने उसाचा रस काढला न कोणता चरका होता न काही यंत्र.. हे पाहून त्या चारही भावांना महाराजांच्या योग सामर्थ्यचि अनुभूती आली.. अश्या प्रकारे पाटील बंधू श्री महाराजांचे सेवक ( भक्त) झाले .. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – श्री महाराज आपली चुकी माफ करतात फक्त आपणस महाराजांना ह्रदयपूर्वक समर्पित व्हायचे आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय