निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

May 4, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी भक्त हो…आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो…निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक…म्हणजे मनात शंका नको…पहा..आपले मन शंका निर्माण करतेच…माझे अमूक काम होईल का? नाही होणार…होईल…मन म्हणते होईल…मध्येच म्हणते नाही होणार…मग आता इथे आपल्याला…पहिले काम करावे लागेल ते आपल्या मनावर..मग आता मनावर कार्य कसे करणार…आता या बाबत आपण अनेक उपाय वापरू शकतो…पहा आपल्या घरात भांडी असतात…जी भांडी आपण वापरतो ती रोज आपण धुतो…जी वापरत नाही ती आपण धूत नाही त्या भांड्यावर घाण..धूळ जमा होते…म्हणजेच काय आपणास भांडे जसे स्वच्छ करतो..तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणे आवश्यक आहे…आता आपल्याला मन स्वच्छ करायचे आहे…याला उपाय आहे स्वामी नाम..रोज स्वामी नाम घ्यावे…आता..मनात येईल की आपण इतक्या काळा पासून स्वामी नाम घेत आहोत…पण मन निःशंक होत नाही…पहा आपणास हे कार्य अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे…आता स्वामी नाम तर घेतले…दुसरे कार्य आपणास कार्य करायचे आहे…प्रार्थना..स्वामीना प्रार्थना करायची आहे…स्वामी आमचे मन निःशंक करा…हे आम्ही करू शकता नाही. हे आपल्या कृपेनेच शक्य आहे…तिसरे कार्य आपणास करणे आवश्यक आहे…रोज आपणास स्वामी लीला असतील किंवा जे काही सकारात्मक असेल त्याचे वाचन करायचे आहे…आता नुसते वाचन करुन आपणास थांबायचे नाही तर…नेमके आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो यावर आपणास कार्य करायचे आहे… यावर आपणास स्वतः चिंतन मनन करावे लागेल…हे जेव्हा आपण अखंड करू तेव्हा नक्कीच आपले मन निःशंक होईल आणि स्वामी कृपेने स्वामी चरणी निःशंक होईल…धन्यवाद स्वामी..कोटी कोटी धन्यवाद…!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...