साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.
हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.
म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा.
हा काळ तुमच्या उत्कर्षाचा आहे — तो तुमचं कल्याणच करणार आहे.
स्वामी भक्त हो आपण आपल्या चॅनल वर आपले प्रश्न जे आहेत त्यावर चिंतन मनन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याचा उपयोग सर्वांना होणार आहे त्यामुळे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कंमेंट मध्ये मांडू शकता आपण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.. सर्वप्रथम आपले चॅनेल लाईक share आणि सुब्स्क्रिब करा.. आजचा आपला विषय आहे साडेसाती म्हणजे काय ? साडेसाती मध्ये काय करावे.. चला तर मग सुरवात करूया.. साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीवरून साडे-सात वर्षांचा प्रवास (7.5 वर्षे).
यात शनी तीन राशींमध्ये भ्रमण करतो:जन्मराशीच्या आधीची रास (२.५ वर्षे) जन्मराशी (२.५ वर्षे) जन्मराशी नंतरची रास (२.५ वर्षे) म्हणजे एकूण २.५ + २.५ + २.५ = ७.५ वर्षे → म्हणून नाव “साडेसाती”.साडेसाती तेव्हा सुरू होते, जेव्हा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो.
उदा. — जर एखाद्याची जन्मराशी “मकर” असेल, तर शनी धनु राशीत आला की साडेसाती सुरू होते आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर संपते.अनेक लोक साडेसाती आली कि घाबरतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देतात.. पण हा काळ आपल्या उत्कर्षाचा काळ असतो.. शनी देव हे आपल्या कर्माचा हिशोब पाहतात पहा चांगले कर्म असेल तर चांगले फळच मिळेल.. म्हणजेच साडेसाती हा शब्द आपणस सदैव चांगले कर्मच करण्याचा उपदेश करत आहे नाही तर आपण वाईट अश्या परिणामांना सामोरे जावे लागते… म्हणजेच साडेसाती हा आपल्या कर्माचा आरसा आहे.. आता अनेकांना साडेसाती मध्ये दुःख यातना भोगाव्या लागतात पण याच साडेसाती मध्ये आपला उत्कर्ष होत असतो.. पण त्या आपल्याला हि समज असणे आवश्यक आहे कि हि साडेसाती माझे कल्याणच करणार आहे.. हा विश्वास .. श्रद्धा असली पाहिजे.. पहा एखादी गोष्ट वाईट म्हंटल कि आपले वाईटच होते.. जसे आपले विचार तसे आपले जीवन.. साडेसाती मध्ये मन घाबरते खरंतर मनाला सांगा आता तर माझा चांगला काल सुरु झाला आहे.. हो थोडे कष्ट यातना होत आहेत पण या काही वेळे नंतर मला सुखी करणार आहेत.. मला माझ्यात बदल करणे आवश्कयक असेल तो बदल करावा लागेल.. हि तर माझ्या चांगल्या आयुषची सुरवात आहे.. आता मी थांबणार नाही तर लढणार आहेकारण शनिदेव हे माझे कल्याणच करणार आहेत.. आता यात काय करावे.. सर्वप्रथम आपले विचार वर काम करा ते सकारात्मक बनवा.. त्या साठी चांगले पुस्तक वाचा.. शनी देवाला प्रार्थना करा.. शनी मंत्र म्हणा.. मनाला सांगा हा माझ्या उत्कर्षाचा काळ आहे.. जे काही घडतंय, ते माझ्या विकासासाठी घडतंय.” शनी महाराज माझे शत्रू नाहीत तर ते माझे कल्याण करणारे आहेत.. ते माझे उत्कर्ष करत आहेत.. पहा एक विचार किती फरक पडतो.. पहा नक्कीच मार्ग सापडू लागेल.. आज इथे थांबू पुन्हा भेटू नवीन प्रश्न आणि त्यावरील चितनं मनन घेऊन तो पर्यत आपले काही प्रश्न असतील तर पाठवा..द धन्यवाद