देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

Oct 28, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.
देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत?

देवघर – आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे कसे असावे.. खरंतर याचा उत्तर आपण अनेकांची अनेक मत यावर असतात.. मग खरंच प्रश्न निर्माण होतो कि कोणते उत्तर खरे चला आज आजच्या कालानुरूप देव घराचा विचार करू… शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा (ईशान कोपरा) असावे.. पर्यायी दिशा (जर ईशान्य शक्य नसेल तर) पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहेत.. आता हे झाले घरात कुठे असावे याचे उत्तर आता कसे असावे.. याचे साधे आणि सोपे उत्तर आपणस आर्थिक दृष्ट्या परवडणारे.. ज्या देव घरासमोर बसले कि आपले मन शांत होईल असे देव घर असावे.. अनेकदा सांगितले जाते असेच हवे.. तसे नको..पण इथे महत्वाचा विषय आहे.. आपणस आर्थिक दृष्ट्या काय शक्य आहे.. आणि आपल्या मनाला शांती मिळते कि नाही… देवघरात देव कोणते असावेत.. गणपती..कुलदेवी .. कुल देवता टाक .. अन्नपूर्णा .. बाळकृष्ण.. शंख .. घंटा.. इतकेच देव देवघरात असावेत.. आता आपल्या कडे इतरही मूर्ती असतील तर चालतील.. पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा.. अनेकदा काय होते आपण कुठे देवाला गेलो कि मूर्ती आणतो.. फोटो आणतो.. हे शक्य तो टाळा.. कारण काय तर आपणासही देव पूजा करताना सोपे राहील.. आता अनेकदा काय होते काही लोक आपणस सांगतात कि हि मूर्ती नको.. हे देव घरात नको.. आता याबाबत आपणस योग्य तो निर्णय आपण घ्यावा पण एक गोष्ट नक्कीच मनाला खटकते कि कुणी तर सांगते म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो.. ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो.. हे कुठंतरी मनाला पटत नाही.. त्यामुळे हि गोष्ट करताना जे आपणस सल्ला देत आहेत त्यांना योग्य सोलुशन द्याल सांगा.. शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे कि देव घर असे बनवा कि आपल्याला प्रसन्न वाटेल.. आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल.. शेवटी देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर देव आहे चराचरात आहे.. देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देव घर पाहून झाली पाहिजे.. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे विचारा नक्कीच आपण त्यावर विडिओ बनवूया.. धन्यवाद

 


Share
और पढिये !!

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...