श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

Nov 25, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांना सगळीकडे श्री गजानन महाराज आहेत असे वाटत होते त्यांच्या मनाची ही अवस्था ते कोणाला सांगू पण शकत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की,बाळा काय झाले आहे तुला?काही चिंता तुला भेडसावत आहे काय ?तुझी तब्येत तर ठिक आहे ना. त्यांनी वडिलांना सगळे ठिक आहे असे सांगितले परंतु त्यांचा शोध चालूच होता त्यांच्या घरा जवळच श्री रामाजी पंत देशमुख नावाचे वयस्कर गृहस्थ राहत होते ते खूप थकलेले होते त्यांना श्री बंकटलाल ह्यांनी श्री महाराज ह्यांच्या विषयी सांगितले तेव्हा त्यांनी बंकटलाल ह्यांचे शब्द ऐकल्यावर ते म्हणाले की ते कोणी संत महात्मा असणार अशातच चार दिवस निघून गेले श्री बंकटलाल ह्यांच्या मनात ते चालूच होते त्या दिवशी गावात श्री गोविंद बुवा टाकळीकर नावाचे मोठे किर्तनकार आले होते आणि त्याचे त्या दिवशी तेथे किर्तन होते त्यांच्या किर्तनाला श्री बंकटलाल गेले होते तेथे त्यांचा मित्र पितांबर आला होता त्या दोघांची तेथे भेट झाली तेव्हा श्री बंकटलाल ह्यांनी त्यांना श्री गजानन महाराज ह्यांच्या विषयी सांगितले त्याचवेळी श्री बंकटलाल ह्यांना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 

बोध -वरील लीलेतून आपल्याला असा बोध होतो की ,तो म्हणजे आपली श्रद्धा ,भक्ती असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिच आपल्यासाठी चांगली शिकवण आहे हेच पाहणा ,श्री बंकटलाल ह्यांचा विश्वास इतका दृढ होता की एकाच भेटीत त्यांची श्री महाराजांवर श्रद्धा बसली होती… त्यांची श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची आस इतकी दृढ होती की त्यांना चार दिवसात परत श्री महाराजांचे दर्शन झाले… येथे अजून एका  गोष्टींचा आपल्याला बोध होतो तो म्हणजे श्री बंकटलाल ह्यांच्या कडून तो असा की ,आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहीजे . येथे पहा की ,त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की काही समस्या आहे का?परंतु बंकटलाल ह्यांनी त्यांना काही त्रास नको म्हणून त्यांना आदरपूर्वक सांगितले की काही समस्या नाही आहे त्या नंतर त्यांनी श्री गोविंद बुवा ह्यांना सगळी गोष्ट सांगितली तर त्यांनी सकारत्मक भावाने त्यांना सांगितले की ते कोणी महान पुरुष असतील त्यांच्या तोंडाने ही  गोष्ट ऐकल्यावर तर त्यांची श्रद्धा खूप वाढली त्यानंतर त्यांनी खुप पार्थना केली असेल आणि त्याचाच परिणाम म्हणा असे झाले की ,त्यांना श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज ह्यांचे दर्शन प्राप्त झाले बोला श्री गजानन महाराज ह्यांचा जयजयकार असो  त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली बोला श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

प्रार्थना -हे ब्रह्मांड नायका आज आपण आम्हाला आजच्या लीलेच्या माध्यमातून जो भक्ती,श्रद्धा,आणि विश्वास याची शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद इतकी श्रद्धा,भक्ती,आणि विश्वास आमच्या मनात जागवा की जेणेकरून आपल्या लिलांचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पात्र असू ही प्रार्थना करून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...