भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा – नामाचा महिमा अगाध आहे… खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून श्रीलंकेत जायचे होते… जाण्यासाठी मार्ग होता समुद्र मार्ग… इतके अंतर जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता..आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला… मग वानर सेनेनं समुदात दगडे टाकण्यास सुरवात केली… परंतु किती दगडे टाकली तरी ती सर्व पाण्यात जाऊन खाली बसत होती… आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला.. तितक्यात पवन पुत्र श्री हनुमान यांच्या ह्रद्यातून विचार आला कि आपण दगडावर “श्री राम” लिहून दगड पाण्यात टाकावा.. असा विचार करून त्यांनी दगड पाण्यात टाकला असता तो दगड पाण्यावर तरंगू लागला.. हे पाहून सर्व वानर सेनेने… “श्री राम” हा मंत्र लिहून पाण्यात दगडे टाकण्यास सुरवात केली… ती सर्व दगडे पाण्यावर तरंगू लागली.. रस्ता तयार होऊ लागला… हे सर्व पाहून प्रभू श्री रामचंद्राना देखील वाटले आपण सुद्धा श्री राम लिहून दगड पाण्यात टाकावा… त्यानी सुद्धा पाण्यात दगड टाकला.. पण तो दगड पाण्यात बुडला… हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.. तेव्हा पवन पुत्र हनुमान म्हणाले… स्वामी आपण टाकलेले दगड नाही तरणांर कारण… आपण ज्याला धरता तो भवसागर पार होतो.. पण आपण ज्याला सोडता तो हा भावसागर तरु शकत नाही … म्हणजेच ज्याच्या मुखात नाम आहे तो या भवसागरात तरतोच… अश्या रीतीने राम नामाने श्री राम सेतूची निर्मिती झाली… तश्याच सेतू ची निर्मिती आपल्या जीवनात होईल जेव्हा आपण नाम रुपी साधना सातत्याने करू … हा आहे नाम महिमा.
चला तर मग आपण पवनसूत हनुमंतालाच प्रार्थना करूया… हे पवनसुता… आपली श्री राम नामावर इतकी श्रद्धा होती कि… आपण राम नामाचा मार्ग रुपी सेतू निर्माण केलात.. ज्या प्रमाणे आपल्या मुखात अखंड राम नाम होते… त्या प्रमाणे आमच्या मुखात भगवंताचे नाम यावे… नाम महिमा आम्हाला समजावा.. आमच्या ह्रद्यातून नामच यावे… आणि हृदयातील भगवंताची आम्हला ओळख व्हावी… हे पवन सुता हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !