श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ …म्हणजे स्वामी चरणाची विभूती… स्वामी चरणी व वंदन… स्वामी नामाची साधना… स्वामी नामाचे ध्यान… आणि स्वामी चरणाचे  तीर्थ… हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे… त्याला कसलीच भीती भय नाही… या ठिकाणी विभूती म्हणजे आपणस आपल्या नकारात्मक विचारांना हटवून सकारात्मक विचारांची विभूती  मनाला लावायची आहे. नमन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर… पूर्णपणे आपल्या मनास  स्वामी चरणी लीन करायचे आहे… नाम म्हणजे आपणस नामरूपी सेवा रुजू करायची आहे… जेव्हा जेव्हा शकय आहे तेव्हा अखंड स्वामी नाम घ्यायचे आहे… कोणतेही संकट आले तर हृदयातून स्वामी नाम यावे.. इतकी स्वामी नामाची सवय आपणस लावायची आहे… ध्यान हि सर्वोच्च साधना आहे.. रोज थोडा वेळ तरी आपणस ध्यान साधने साठी द्याचा आहे…हे ध्यान आपण स्वामी नामाचे करू शकता.. किंवा आपणस जी ध्यानाची पद्धत सोपी वाटते ते करू शकता… पण ध्यान करावे… तीर्थ म्हणजे या ठिकाणी स्वामी सांगत आहेत अरे जेव्हा तू हि साधना सुरु करशील तेव्हा तुला जो अनुभव येईल तेच तीर्थ असणार आहे.

स्वामीच या पंच प्रानामृतात अनेकदा आपण प्रश्न विचारतो की स्वामी कुठे आहेत.. किंवा आपणस इतर कुणी विचारते कि स्वामी कुठे आहेत… स्वामी कुठे आहेत यांचे उत्तर तर स्वामींनी आधीच दिले आहे – विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ  यात आपणस स्वामी भेटतील.. इथे याचा स्पष्ट अर्थ असा आहे.. जेव्हा आपण आपल्या स्वतः वर काम करू… आपली आंतरिक सफाई होईल तेव्हा आपणस नक्कीच स्वामी कुठे आहेत याची अनुभूती येईल.

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती स्वामी काय आहेत तर स्वामी हे अनुभूती आहेत.. मग स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावे..काही नाही फक्त आपणस वर सांगितल्या प्रमाणे सेवा करायची आहे .. मग अनुभूत येणारच आहे.. हो पण त्या साठी आपणस सेवेत सातत्य असणे गरजेचं आहे. सातत्य असेल तर आपणस प्रचिती येतेच.

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती एकदा आपण सेवेस सुरवात केली कि आपणस अनुभव येतात… पण यात कसे असते आपण स्वामींना आपल्या मनाची चावी त्यांच्याकडे  द्यायची आहे… मग स्वामी महाराज आपला हात धरतात.. स्वामींनी आपला हात धरला असताना आपल्या मनात जर अनन्य भक्ती आणि श्रद्धा असेल तरी.. स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत… फक्त गरज आहे आपल्या सेवा श्रद्धा आणि विश्वासाची.


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...