विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ – या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ …म्हणजे स्वामी चरणाची विभूती… स्वामी चरणी व वंदन… स्वामी नामाची साधना… स्वामी नामाचे ध्यान… आणि स्वामी चरणाचे तीर्थ… हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या जीवनात आहे… त्याला कसलीच भीती भय नाही… या ठिकाणी विभूती म्हणजे आपणस आपल्या नकारात्मक विचारांना हटवून सकारात्मक विचारांची विभूती मनाला लावायची आहे. नमन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर… पूर्णपणे आपल्या मनास स्वामी चरणी लीन करायचे आहे… नाम म्हणजे आपणस नामरूपी सेवा रुजू करायची आहे… जेव्हा जेव्हा शकय आहे तेव्हा अखंड स्वामी नाम घ्यायचे आहे… कोणतेही संकट आले तर हृदयातून स्वामी नाम यावे.. इतकी स्वामी नामाची सवय आपणस लावायची आहे… ध्यान हि सर्वोच्च साधना आहे.. रोज थोडा वेळ तरी आपणस ध्यान साधने साठी द्याचा आहे…हे ध्यान आपण स्वामी नामाचे करू शकता.. किंवा आपणस जी ध्यानाची पद्धत सोपी वाटते ते करू शकता… पण ध्यान करावे… तीर्थ म्हणजे या ठिकाणी स्वामी सांगत आहेत अरे जेव्हा तू हि साधना सुरु करशील तेव्हा तुला जो अनुभव येईल तेच तीर्थ असणार आहे.
स्वामीच या पंच प्रानामृतात– अनेकदा आपण प्रश्न विचारतो की स्वामी कुठे आहेत.. किंवा आपणस इतर कुणी विचारते कि स्वामी कुठे आहेत… स्वामी कुठे आहेत यांचे उत्तर तर स्वामींनी आधीच दिले आहे – विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ यात आपणस स्वामी भेटतील.. इथे याचा स्पष्ट अर्थ असा आहे.. जेव्हा आपण आपल्या स्वतः वर काम करू… आपली आंतरिक सफाई होईल तेव्हा आपणस नक्कीच स्वामी कुठे आहेत याची अनुभूती येईल.
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती– स्वामी काय आहेत तर स्वामी हे अनुभूती आहेत.. मग स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावे..काही नाही फक्त आपणस वर सांगितल्या प्रमाणे सेवा करायची आहे .. मग अनुभूत येणारच आहे.. हो पण त्या साठी आपणस सेवेत सातत्य असणे गरजेचं आहे. सातत्य असेल तर आपणस प्रचिती येतेच.
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती– एकदा आपण सेवेस सुरवात केली कि आपणस अनुभव येतात… पण यात कसे असते आपण स्वामींना आपल्या मनाची चावी त्यांच्याकडे द्यायची आहे… मग स्वामी महाराज आपला हात धरतात.. स्वामींनी आपला हात धरला असताना आपल्या मनात जर अनन्य भक्ती आणि श्रद्धा असेल तरी.. स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत… फक्त गरज आहे आपल्या सेवा श्रद्धा आणि विश्वासाची.