आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 7, 2021 | Uncategorized

Share

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत
मागें एक पुढे एक ।
ऐसा जयाचा दंडक
बोले एक करी एक ।
तो एक पढत मूर्ख ।।
रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते… एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणस पटली नाही कि आपण तिच्या मागून… तिच्या विषयी चर्चा करतो … मग आपण सारासार विचार न करता त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो.. पण खरोखर ती व्यक्ती मूर्ख आहे कि आपणच मूर्ख आहोत… कारण ज्या व्यक्ती विषयी आपण बोलत आहोत… ती व्यक्ती समोर नाही तरी देखील आपण तिच्या विषयी नकारात्मक बोलत असतो… नक्की आपण स्वतः ला च तर मूर्ख बनवत आहोत कि नाही… आपणच विचार करावा… समर्थ सांगतात… ज्या व्यक्ती विषयी आपण मागून टीका करतो… तीच व्यक्ती समोर असेल तर आपण तिची खोटी स्तुति करतो…खरंच आपण त्याला मूर्ख बनवत नाही तर आपणस स्वतःच आपण मूर्ख बनवतो पण हे आपल्याला समजतच नाही… आपण मराठीत एक म्हण ऐकिली आहे… बोले तैसा वागे … त्याचे वंदावे पाऊले… या विषयी समर्थ सांगतात कि… लोकांशी बोलताना एक बोलतो व प्रत्यक्ष कृती करताना मात्र आपण त्याच्या विरुद्ध कृती करतो… जसे आपणस व्यायामाचे महत्व माहित आहे… म्हणून आपण इतरांना त्याचे इतके महत्व सांगतो कि… त्या व्यक्ती ला वाटते खरंच हा एक उत्कृष्ट व्यायाम पटू असेल… प्रत्यक्षात आपण कधीच व्यायाम करत नाही… मग हा मूर्खपणा नाही का ? पहा समर्थानी एका श्लोकात आपल्यातील मूर्खपणाचे दर्शन आपणस करून दिले आहे… यावर आपण स्वतः चिंतन करावे .
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था तू आज आम्हाला आमच्यातील एक मूर्खपणा दाखवला त्याबद्दल धन्यवाद… आम्हीं जेव्हा तो वाचतो तेव्हा तो छान वाटतो… पण मनावरच्या मूर्खपणाच्या सवयी मुळे आम्हाला आमचा मूर्खपणा कधीच दिसत नाही… आजचा हा श्लोक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनव… जेणेकरून… आम्हाला आमच्यातील मूर्खपणा जाणवेल… आणि मूर्ख पणा आमच्यातून हळूहळू नष्ट व्हावा असा आम्हाला आशीर्वाद द्या… धन्यवाद समर्था … कोटी कोटी धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...