स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

Dec 16, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले आणि कृष्णाजी पाटील यांना म्हणाले आम्ही अनेक तीर्थ यात्रा करून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रम्हगिरी सुद्धा आहेत.. आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत आमची सेवा करावी..आपण त्या महाराजांची सेवा करता अहो त्या पेक्षा आमची सेवा करा.. त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाजी एवढेच म्हणाले कि आज तर आमच्याकडे भाकरी आहेत त्याचा स्वीकार करा उद्या शिरा पुरी देऊ..संध्याकाळी ब्रम्हगिरी बुवा नी प्रवचन सुरु केले अनेक वस्ती वरचे लोक प्रवचन ऐकण्यास आले होते.. त्यांनी प्रवचनास भगवद गीतेचा श्लोक घेतला ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ त्यावर निरूपण करू लागले.. त्यांचे निरूपण ऐकून लोकांना काही समजत नव्हते कि महाराज काय सांगत आहेत.. त्या मुळे सर्व लोक उठून श्री गजानन महाराजांकडे गेले.. हे सर्व पाहून गोसाव्याला राग आला.. तेव्हा श्री महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते.. अचानक चिलिम मधील एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंगानी पेट घेतला.. हे सर्व पाहून तेथील लोक घाबरले आणि श्री महाराजांना खाली उतरण्याची विनवणी करू लागले.. भास्कर पाटील पाणी आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा महाराज म्हणाले अजिबात पाणी आणू नकोस.. हा सर्व प्रकार ब्रम्हगिरी सुद्धा पहात होते.. तेव्हा महाराज म्हणाले ब्रम्हगिरी महाराज या बसा माझ्या शेजारी पलंगावर बसा..आताच तुम्ही सांगितले ना.. ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ श्री महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले जा घेऊन या बुवांना या पलंगावर..हे ऐकून बुवा घाबरले आणि पळून जाऊ लागले पण भास्कर पाटील यांनी त्याला पकडले आणि महाराजांकडे घेऊन आले.. महाराज त्यांना म्हणाले अहो आपण जो श्लोक सांगितले त्यावर जे विवेचन केले ते कृतीतून करून दाखवा..बसा या पलंगावर.. तेव्हा बुवा म्हणाले महाराज मला माफ करा.. मी पोट भरू संत आहे.. शिरा पुरी खाण्यासाठी मी संत झालो आहे..लोकांनी महाराजांना विनंती केली आपण खाली उतरा.. महाराज उतरे पर्यंत सर्व पलंग जळून गेला होता केवळ महाराज बसले होते तेवढा भाग मात्र चांगला होता.. ब्रम्हगिरी बुवा महाराजांच्या चरणी लीन झाले.. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला.. जर आपणस स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये.. बुवाला आपली चूक समजली तो.. महारांजाच्या चरणी लीन झाला.. अश्या रीतीने ब्रहागिरी बुवा विरक्त झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

बोध- वरील लीलेतून महाराज आपणस खूप खोल असे मार्गदर्शन करत आहे.. पहा अनेकदा आपणस एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसताना आपण असे दाखवतो कि मला खूप माहिती आहे.. हि गोष्ट अध्यात्म अनेकदा घडते..आपणस या गोष्टी पासून दूर राहायचे आहे.. तसेच आज आपण पाहतो कि अनेक जण अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आपणस असे वाटते कि हा बरोबर तो चूक.. खरंतर आपणस कुणा वर टीका करायची नाही पण आपणस जागृत राहून ईश्वर सेवा करायची आहे.. कारण अनेक ब्रह्मगिरी बुवा आहेत.. आपणस श्री महाराजांची लीला आपल्या जीवनसाठी मार्ग दर्शन करत आहेत.. अनेकदा आपले असे होते कि बुवा प्रमाणे आपणास अनेक स्तोत्र मंत्र पाठ असतात.. आपल्यात अहंकार निर्माण होतो.. खरंतरं जो पर्यंत आपली आंतरिक शुद्धी होत नाही तो पर्यंत आपणास खरे ज्ञान मिळू शकत नाही.. त्या मुळे आपणस अनेक गोष्टी मध्ये न अडकता.. सहज सोपी साधना करायची आहे.. जसे रोज नाम जप करा.. शक्य असेल तर रोज एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ वाचा.. आणि नुसता ग्रंथ न वाचता.. श्री महाराजांना प्रार्थना करा आम्हाला मार्गदर्शन करा.. पहा ज्या प्रमाणे बुवांना मार्गदर्शन मिळाले तसे आपणस हि मिळावे.. हाच बोध होतो.. बोला श्री गजानन महाराज कि जय.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया.. श्री महाराज ज्या प्रमाणे आपण ब्रम्हगिरी बुवाना योग्य मार्ग दाखवला.. आणि सत्याचे ज्ञान प्रदान केले.. असे ज्ञान आम्हाला प्रदान करा.. आम्हाला ज्ञानी नाही तर समर्पित भक्त बनवा.. आम्हाला इतर गोष्टीत न अडकण्याची बुद्धी द्या.. आपल्या नाम सेवेची सेवा द्या..बाकी काहीच नको.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

डिजिटल दुनिया –

डिजिटल दुनिया - आज का युग डिजिटल युग है .. हम सभी डिजिटल हो गए है ... एक समय था की हम एक दूसरे से  सवांद करने के लिए कई महीने- साल रुकना पड़ता था... क्यूंकि लोगों को एक गांव से दूसरे गांव संदेशा  देने के लिए  किसीको भेजना पड़ता था ..बाद में संदेशा  भेजने के लिए पत्रों...

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी  - गणेश भक्तोंका एक व्रत  है जिसे संकष्टी चतुर्थी  कहाँ  जाता है ! अनेक भक्त यह व्रत करते है ! इस व्रत के पीछे बहोत सी कथाये है ! अभी हम गणेश पुराण में जो कथा है वो यहाँ देखते है ! कृतवीर्य  नाम के राजा थे वे एक परिपूर्ण ऐसे राजा थे ! उनकी पत्नी का नाम...

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ की जाती है ?

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ  की जाती है ? वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कार्य कोनसा भी हो उस कार्य का आरंभ भगवान् श्री गणेश जी की पूजा से किया जाता है ! यह प्रथा बरसो से चल रही है और चलती रहेगी जब हम...

कीर्तन भक्ति – नवविधा भक्ति

नवविधा भक्ति का दूसरा प्रकार कीर्तन भक्ति...सचमें कीर्तन करना भी भगवद भक्ति में आता है यह हमारे लिए कितनी आनंददाई बात है... कीर्तन भक्ति यानी ईश्वर के गुण, चरित्र, नाम, पराक्रम आदि का आनंद से सबके साथ कीर्तन करना... अब हम पहले भक्ति में श्रवण करते है... जो भी कुछ...

गजानन महाराज चरित्र दर्शन 6

श्री महाराज इन्होंने भोजन किया पीताम्बर ने लाया हुवा पानी पिया उसके बाद श्री महाराज बंकट लाल को बोलते है..तुम्हारे जेब में जो सुपारी है वो दो हमको ..श्री महाराज ने ऐसे बोलते ही श्री बंकट लाल ने जेब से सुपारी निकालकर श्री महाराज को दी उसी जेब में..दो पैसे थे वो भी।उसने...

श्रवण भक्ति – नवविधा भक्ति

हमारी संस्कृति  में भक्ति के नौ प्रकार बताये गए है... इस प्रकार में सर्वप्रथम आती है श्रवण भक्ति... हर एक भक्ति पद्धति अलग अलग होती है... लेकिन श्रवण भक्ति सभी लोग जाने अनजाने में करते ही है...इसके बारे में श्री समर्थ रामदास स्वामी कहते है " प्रथम भजन ऐंसे जाण |...

स्मार्ट फ़ोन या सेल्फी फ़ोन

स्मार्ट फोन से हम  स्मार्ट बन गए.. सच  में स्मार्ट फ़ोन की वजह हम अनेक यादे फोन में चित्रित कर सकते है... यह हमें मिला हुवा वरदान ही है... क्यूंकि १५ साल पहले फोटो निकले के लिए  हमें फोटो स्टुडिओ जाना पड़ता था... आज हम जहाँ जायेंगे वहाँ फोटो निकाल सकते है.. वो फोटो...

श्री गजानन महाराज दर्शन लीला ०५

श्री बंकटलाल और पीतांबर  शिंपी  कीर्तन सुनने गए थे... लेकिन उधर ह उनको श्री गजानन महाराज दिखे... फिर क्या वो कीर्तन छोड़कर श्री महाराज के पास आ गए... उन्होंने श्री महाराज जी से पूछा...की आपको खाना लावू क्या? तब श्री महाराज उन्हें बोले आपको जररूत होंगी तो मालिनी के घर...

गजानन महाराज चरित्र दर्शन 4

श्री गजानन महाराज जी के दर्शन क प्यास जगी श्री बंकटलाल जी के मन में   श्री गजानना चरित्र दर्शन ४ - श्री बंकटलाल जी को पूर्ण विश्वास था की श्री गजानन महाराज जी ब्रम्हांड नायक है... अब उनके मन में श्री दर्शन की प्यास जग गई थी... उनको भूख प्यास मीट  गई थी... उनकी...

नवरात्र व आपली प्रगती

  नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी...आपण अनेक सण- वार साजरे करतो... करत आहोत... आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे... आपण दरवर्षी नवरात्र साजरी...