Share

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक, तसेच धर्म संहिता 12 हजार श्लोक अश्या प्रकारे शिव महा पुराण कथा १ लाख श्लोकांची आहे…व्यासांनी आपल्या साठी २४ हजार श्लोकांची संक्षिप्त महा पुराण कथा लिहिली…शिव पुरणाचे स्थान ४ क्रमांकावर येते…यात सात संहिता आहेत..यातील पहिला संहिता विधवेश्वर संहिता आहे…दुसरी रुद्र संहिता, तिसरी शत रुद्र संहिता,चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता,सहावी कैलास संहिता, सातवी वायवीय संहिता.. याला शैव शिरोमणी भगवान व्यास यांनी संक्षिप्त शिव पुराण निर्माण केले..याचे सर्वांनी श्रवण पठण करावे.. शिव पुराणात काय आहे…भक्ती , घ्यान आणि वैराग्य यांचा उल्लेख शिव पुराणात येतो…जेव्हा सृष्टी ची उत्पत्ती सुरू होती..जे सहा महर्षी होते त्यांच्यात वाद निर्माण झाला।की अमुक एक।गोष्ट श्रेष्ठ…त्यांच्यातील।हा वाद इतका विकोपाला।गेला की ते सर्व ब्रम्हाजी यांच्याकडे गेले…आणि त्याना विचारले की सम्पूर्ण तत्व पेक्षा वेगळा पुराण पुरुष कोण आहे??तेव्हा ते म्हणतात देवाधिदेव महादेव..यांना प्राप्त करायचे असेल तर भक्ती करावी..सर्व देव यांचीच पूजा करतात…भव सागर पार करण्याची शक्ती शिव उपासनेत आहे..शिव भक्ती कशी करावी..कानाने श्रवण..मनाने मनन.. आणि मुखाने कीर्तन हे श्रुतीचे वाक्य आपणस प्रमाण भूत आहे..पराशर मुनी यांचे पुत्र..व्यास देवजी सरस्वती..नदी काठी साधना करत होते..एके दिवशी तिथे सनतकुमार येतात..त्यावेळेस व्यास देवजी ध्यानस्थ होते..काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी..सनतकुमार यांना पाहिले…ते तात्काळ उठले.. त्यांचे आदर पूर्वक पुजन केले…आता व्यासजी.. सनतकुमार यांना सांगतात..तुम्ही शिव भक्ती करा..यात श्रवण मनन आणि कीर्तन करा..पूर्वी मी अनेक साधनांचा अवलंब केला आणि त्यात अडकलो..हाती मात्र काहीच आले नाही..पण जेव्हा मी भटकलो आणि मंदराचल पर्वतावर गेलो..तिथे मला शिव कृपेने..भगवान नंदिकेश्वर भेटले आणि त्यानी मार्गदर्शन केले..त्यांनीच मला मुक्ती चे साधन सांगितले…आपण ही सर्वांनी या तिन्ही साधनांचा अवलंब करा बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – शिव भक्तहो पहा श्री शिव महा पुराण हा ग्रंथ किती मोठा आहे.. व्यासांना त्याच वेळेस जाणवले असेल कि कल युगात लोकांना सोपे असे साधन निर्माण व्हावे त्यांना शिव तत्त्व काय आहे हे समजावे या साठी त्यांनी श्री शिव महा पुराण संक्षिप्त श्लोकात निर्माण केले.. तत्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.. या लीलेस निमित्त करून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांना प्रार्थना करूया कि आमच्या कडून शिव महा पुराण कथा श्रवण मनन करून घ्या… पहा वरील लीलेत येते कि सृष्टी ची निर्मिती झाली तेव्हा महर्षी मध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण.. खरंतर हा वाद तर आपल्या दैनंदिन जीवनात रोज घालत असतो.. जसे मी जे म्हणतो किंवा करतो ते किती श्रेष्ठ आहे खरंतर अनेकदा हा आपले खूप मोठे नुकसान करत असतो कारण आपण करतो तेव्हा आपणस प्रेरणा देणारी कोणती तरी एक शक्ती असते पण आपण मात्र ते विसरून जातो आणि खोटा अहंकार बाळगतो.. थोडक्यात आपणास आपल्यातील खोटा अहंकार दूर करायचा आहे.. श्री शिव महा पुराण कथा आपणस श्रवण, पठण आणि कीर्तन हि सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. व्यास देव स्वतः सांगतात कि ते आधी अनेक सेवा करत होते पण त्यांना मुक्तीची मार्ग म्हणा किंवा सत्य मार्ग मिळत नव्हता पण जेव्हा शिव भक्ती करू लागले तेव्हा त्यांना समजले कि श्रवण मनन आणि कीर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे.. आपणस हि मार्गाचा अवलंब करायचा आहे.. पहा रोज थोडा बदल आपले आयुष्य बदलून टाकेल.. तरी सर्वानी या वर कार्य करावे हि विनंती… बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण सर्व मिळून महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझी भक्ती कशी करावी हे आम्ही जाणत नाही.. त्या मुळे नको त्या अनेक मार्गात आम्ही अडकतो.. आजच्या लीलेत सांगितल्या प्रमाणे आमच्या कडून श्रवण,, मनन आणि कीर्तन सेवा करून घे हीच प्रार्थना.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......