चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?
मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात… असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान…खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको वाटते..कारण मनाला चांगले नको असते… आपण आपले बाह्य शरीर वा कपडे स्वच्छ करतो पण मन मात्र कधीच स्वच्छ करत नाही… जेव्हा हे विचार येतात याचा अर्थ आपण आतून स्वच्छ होत आहोत…जो पर्यंत आतून स्वच्छ होत नाही तो पर्यंत प्रगती कशी होईल.म्हणून कितीही त्रास होऊद्या पण नाम साधना..नाम जप सोडू नका..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!
www.chetnakeswar.com
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4
खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...