श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

Nov 11, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात होते… आता हे दृश्य येणारे जाणारे लोक पाहत होते… परंतु त्यांच्यापाशी जाऊन कोणी त्यांच्याशी बोलले नाही… त्याच वेळेस त्या तिथून श्री बंकटलाल व त्यांचे स्नेही श्री दामोदरपंत कुलकर्णी तिथून जात होते… श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिले कि महाराज कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात आहेत… हे पाहून ते श्री दामोदरपंत कुलकर्णी यांना म्हणाले कि आपणस दिसताना हे सर्वसामान्य व्यक्ती वाटत आहेत परंतु नक्कीच हे सामान्य व्यक्ती नसावेत कारण जर हे सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी अन्न मागून खाल्ले असते आणि श्री पातुरकर यांनी सुद्धा त्यांना जेवण दिले असते… हे नक्कीच कुणीतरी मोठे संत असावेत… त्यानंतर श्री बंकटलाल श्री महाराजान जवळ गेले… आणि विनयपूर्वक श्री महाराजांना विचारले कि ” महाराज आपण हे काय करत आहात ? आपणस भूख लागली आहे का ? मी आपल्या साठी भोजन घेऊन येऊ का ? श्री महारांजानी त्यांच्याकडे पहिले… त्यांची तेजः पुंजः मुद्रा पाहून श्री बंकटलाल यांना काय बोलावे हे सुचलेच नाही व ते लगेचच श्री पातुरकर यांच्या कडे गेले व त्यांच्या कडून भोजनाचे ताट घेऊन आले… त्यात विविध पदार्थ होते.. सर्वांनी श्री महाराजांना भोजन करण्याची विनंती केली… महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र केले व भोजन केले… हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले… आणि त्याच वेळी श्री श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध -वरील लीलेच्या माध्यमातून आपणस अनेक बोध प्राप्त होत आहेत… ब्रम्हांड नायकाची प्रत्येक लीला आपणस शिकवण देण्यासाठीच असते… परंतु ती समजण्यासाठी श्री बंकटलाल अग्रवाल यांच्या सारखी भक्ती असावी लागते… पहा ना वरील लीलेत असंख्य लोक त्या रस्त्यावरून गेले… परंतु प्रत्येकाने हाच विचार केला कि कुणीतरी सामान्य व्यक्ती आहे… भूख लागली असेल त्या कारणाने… कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत खात असतील… त्याच रस्त्याने श्री बंकटलाल अग्रवाल त्यांच्या स्नेह्या सोबत जात असताना त्यांनी पाहता क्षणी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती नसावेत… पहा त्यांची चेतनेची अवस्था कि उच्च होती… तत्यांची लीला पाहूनच त्यांनी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती असू शकत नाहीत… श्री महाराज यांनी सर्व पदार्थ एकत्र केले व त्या नंतर भोजन केले… थोडक्यात बंकटलाल यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होत होते.. त्या प्रश्नाचे श्री महाराजांनी काही न बोलता उत्तर दिले… खरोखर श्री बंकटलाल यांची भक्ती ची अवस्था किती उच्च्तम असेल कि त्यांनी श्री महाराजांची लीला पाहूनच समजून गेले कि … हे कुणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाहीत… आपणस श्री महाराज हा सुद्धा बोध देत आहेत कि.. अनेकदा काय होते कि आपणस अनेक पदार्थ आवडत नसतात त्यामुळे आपण ते खात नाहीत… परंतु श्री महाराज आपणस सांगत आहेत कि कोणत्याही पदार्थाचा स्वाद हा जीभेपर्यंत मर्यादित असतो… अन्न हे आपल्या शरीराची गरज आहे… त्याचे मुख्य काम आपल्या पोटाची तृष्णा शांत करणे … आणि आपणस शक्ती… स्फूर्ति देणे आहे… स्वाद घेणे हे उद्दिष्ट नाही…. त्या मुळे आपणस सर्व अन्न पदार्थांचे सेवन देवाचा प्रसाद म्हणून करायचे आहे …आणि हाच गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची आहे … !

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज.. आम्ही आपली लीला समजण्यास असमर्थ आहोत… आमच्या चेतनेची पायरी( समज) फारच कमी आहे… परंतु तुमची कृपा असेल तर नक्कीच ती वाढेल … आम्ही आपणास प्रार्थना करतो कि जशी कृपा श्री बंकटलाल अग्रवाल यांच्यावर केलीत.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव… ! धन्यवाद आई… धन्यवाद हि प्रार्थना करवून घेतल्या बद्दल धन्यवाद!


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...