अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

Nov 4, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!!

श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते… ते मठाधिपती होते… एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता… त्या निमित्त त्यांनी अनेक लोकांना भोजनासाठी निमंत्रण दिले होते…त्या काळी जेवण करण्यासाठी पानाच्या पत्रावळीचा वापर केला जात… आज हि अनेक ठिकाणी याचा वापर होतो… जेवण  झाल्यावर त्या पत्रावळी त्यांच्याह घर शेजारी असणाऱ्या कचरा कुंडीत टाकल्या जात होत्या… सर्वप्रथम त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज त्या कचरा कुंडीपाशी येऊन बसलेले दिसले… आजानुबाहु , तेजस्वी मुद्रा ,दिगम्बर ,अंगावर जुन्या कापडाची बंडी आणि हातात चिलीम होती… परब्रम्ह श्री गजानन महाराज त्या पत्रावळी वरील जे भाताचे शीत होते ते उचलून खात होते…

!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – परब्रम्हाची प्रत्येक लीला हि आपल्या साठी प्रेरणा देणारी आहे… आणि त्यांच्या लीलेतुन बोध प्राप्त होण्यासाठी त्यांची कृपाच असावी लागते…  चला आपण त्यांनाच प्रार्थना करूया आम्हाला  हृदयातून मार्गदर्शन करा… अन्नाचा प्रत्येक कण  हा महत्वपूर्ण असा आहे… एक एक कणा पासून अनके कण बनतात आणि त्यातून अनेक जणांचे उदरभरण होऊ शकते… अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हि समज आपणस कायम ठेवायची आहे… आपणस अन्नाचा एकही कण  वाया जाणार नाही या साठी प्रयन्त करायचा आहे… या ठिकाणी श्री गजानन महाराज श्री पातुरकर यांच्या  घरी जाऊन सुद्धा जेवण करू शकत होते… परंतु त्यांना आपल्याला समज देण्यासाठी हि लीला केली आहे… आपल्याला जेवढे आवश्यक आहे तवढेच अन्न  घ्या .. तसेच अन्नाच्या प्रत्येक कणाला  धन्यवाद द्या… त्याचप्रमाणे ज्या शेती मधून हे धान्य आले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या… ज्यांनी हे अन्न  बनवले त्यांना धन्यवाद द्या…तसेच आणखीन ऐका  गोष्टीचे भान आपणस ठेवायचे आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाहेर हॉटेल मध्ये जेवण करण्यास जातो त्यावेळेस आपणस या गोष्टी चे जास्त भान ठेवायचे आहे… कारण आपण अनेकदा अन्न  तसेच टाकून देतो… इथे आपणस विशेष काळजी घ्यायची आहे… आपला आहे अन्ना विषयी चा भाव…  समज श्री गजानन महाराजांच्या सेवेचे पहिले पाऊल ठरेल… !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज आज आपण आम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह हि जी समज  दिलीत त्या बद्दल धन्यवाद…हि समज आम्हाला कायम राहावी आणि अन्नाच्या एकाही  कणाचे नुकसान आमच्या द्वारे होऊ नये..अन्नाचा प्रत्येक कण  ग्रहण करताना तुमच्या बोधाची.. लीलेची आठवण असावी हीच प्रार्थना… धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद

 


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...