चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?
मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल…अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो…तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही…अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो…जो पर्यंत आपण एका ठिकाणी विश्वास ठेवत नाही..तो पर्यंत आपणस मार्ग दिसणार नाही..विश्वासाने आई वडिलांची सेवा करा..मनात विश्वास असेल की ही सेवा मला यश कीर्ती देणार आहे..तर नक्कीच आपणस अपेक्षित यश मिळेल..पण यात आपले कष्ट महत्वाचे…कारण कोणतीही गोष्ट स्वामीं विना प्रयत्न देत नाहीत…सेवा आणि यश मिळे पर्यंत कष्ट हेच यशाचे सूत्र आहे…धन्यवाद स्वामीं… बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय
www.chetmakeswar.com
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4
खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...