स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

Jan 30, 2023 | Uncategorized

Share

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड आहे..आपणस वाटते की स्वामीं नाम जप केला व स्वामींचे स्तोत्र वाचले की झाली सेवा..काहींना वाटते की अजूनही काही इतर देव..देवतांचे स्तोत्र म्हंटलं नाही तर स्वामीं सेवा पूर्ण होत नाही..मग आपण यात आणखी सेवा ऍड करतो..पहा प्रत्येक सेवा ही परिपूर्णच आहे..असे नाही की अमुक मंत्राचा जप केला तरच ती स्वामीं सेवा..म्हणजेच कोणतीही सेवा करा पण ह्रदयातून करा..फक्त स्वामीं नाम घेतले तरी ती स्वामीं ची परिपूर्ण सेवा आहे..पण आपले मन नेहमी सगळी खिचडी करते..ही सेवा केली तर असे होईल..नाही केली तर असे होईल..पहिला हा  चुकीचा विचार मनातून काढून टाका.. आपण कोणतीही सेवा करा पण मनापासून करा..तुम्ही स्वामीं म्हणा, राम म्हणा किंवा श्री स्वामीं समर्थ म्हणा..प्रत्येक हाकेला स्वामीं ओ देतातच.. फक्त ती हाक ह्रदयातून हवी..आता हे झाले सेवेचे.. पण ही सेवा अपूर्ण आहे..जर आपण कर्म आणि सेवा यात भेद करत असू तर..कारण स्वामीं नी आपणस जे प्रापंचिक काम दिले आहे..ते जर आपण फक्त काम म्हणून पहात असू तर आपण स्वामीं सेवा ह्रदयातून करत नाही.. म्हणजेच आपणस जे काम मिळाले आहे ती सुद्धा स्वामीं सेवा आहे..ते काम करताना आपले भाव जर नकारात्मक असतील तर..आपली स्वामीं सेवा ही कायम अपूर्ण असते.. आपल्यावर स्वामीं कृपा होऊच शकत नाही.. म्हणून नेहमी आपण जे काही काम करता त्यात स्वामीं सेवेचा भाव ठेवा..आपण गृहिणी आहात.. तर आपले कर्तव्य आहे की घरातील काम हे स्वामी सेवा म्हणून करा..पहा आनंद मिळेल.. नाहीतर आपणस कायम वाटत राहील मला सुट्टी च नसते..अहो स्वामीं सेवेकरी तोच जो म्हणतो..धन्यवाद स्वामीं मला सेवेची संधी दिली…हेच आपण जी काही नोकरी करतो काम करतो याला सुद्धा लागू होते.. जर आपण काम चुकार पणा करत असू..आपले आचरण हे भ्रष्टाचार करणारे असेल तर..आपण कितीही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ती स्वामीं सेवा कधीच असू शकत नाही..पण आपले आचरण शुद्ध असेल आपण आपल्या प्रत्येक कर्मास स्वामी सेवा मानत असाल तर नक्कीच आपलीं स्वामीं सेवा ही नित्यसेवा आहे..स्वामीं कृपेचा वर्षाव आपल्यावर होत आहे..खरंतर हा आपण स्वतः चिंतन मनन करण्याचा विषय आहे..यावर आपण अधिक चिंतन मनन करा..अजूनही काही प्रश्न असतील विचारा..नक्कीच आपण त्यावर चिंतन मनन करूया..स्वामीं ना अपेक्षित अशी स्वामीं सेवा करूया..स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म करूया..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......