मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

Nov 20, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6
श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते… गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक विहीर होती तिथे कणसे भाजण्याची तयारी करण्यात आली.. तिथेच एक कल्पवृक्ष होते त्या खाली महाराज बसले .. त्या झाडाला मधमाश्याचे पोळे होते.. हे कुणाच्याही लक्षात आले नाही.. तिथेच कणसे भाजण्यासाठी सुरवात केली.. कणसे भाजत असताना धूर व अग्नीची दाहकता याचा परिणाम असा झाला कि त्या झाडावरील मधमाश्या उठल्या व सर्वांना चावू लागल्या.. सर्व जण पळू लागले श्री महाराज मात्र जागेवरून उठले नाही..ते स्वस्वरूपात रममाण होते.. सर्व माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या.. जसे कि महाराजांनी माश्यांची शाल केली आहे.. हे सर्व पाहून श्री बंकटलाल यांचे हृद्य द्रवित झाले.. त्यांच्या मनात विचार आला कि उगाचच आपण श्री महाराजांना कणसे खाण्यासाठी इथे आणले.. आणि श्री बंकटलाल श्री महाराजांकडे जाऊ लागला.. त्या क्षणी श्री महाराजांनी त्या मध माशांना आपल्या जागी जाण्याची आज्ञा दिली.. ते म्हणाले अरे माझा खरा भक्त माझ्या साठी येत आहे.. त्याला त्रास देऊ नका तुम्ही आपल्या जागेवर जा.. महाराजांनी असे म्हणताच सर्व माश्या झाडावर जाऊन बसल्या.. श्री बंकटलाल यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.. ते महाराजांना म्हणाले.. मी सोनाराला घेऊन येतो काटे काढण्यासाठी.. बंकटलाल सोनाराला घेऊन येतात.. सोनार पहातो तर त्याला एकही काटा दिसत नाही… तेव्हा तेव्हा सोनार म्हणतो कि मला तर काटे दिसत नाहीत.. तेव्हा श्री महाराज म्हणाले काटे काढण्यासाठी चिमट्याची आवश्यकता नाही.. महाराजांनी काही क्षण श्वास रोखला व काही क्षणात सर्व काटे बाहेर आले.. महाराजांचे शरीर पूर्वी प्रमाणे झाले.. हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीला म्हणजे भक्ती कशी असावी हे सांगण्यासाठीच हि लीला आहे.. पहा ब्रम्हांड नायक कणीस खाण्यासाठी शेतात गेले.. खरे तर हे एक निमित्त होते परीक्षा पाहण्यासाठी..मधमाशी मध देते पण ते अदृश्य रूपाने देते.. कारण आपण मध तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा तिथे माशी नसेल.. म्हणजेच गुरुकृपा तेव्हाच होते जेव्हा संकट रुपी माशी दूर करू.. संकट रुपी माशी असतानाही जेव्हा आपण अखंड सेवा सुरु ठेवतो.. तेव्हा त्या सेवेचे फलित म्हणजे मधाप्रमाणे गोडवा होय.. जेव्हा आपण संकटाशी दोन हात करतो.. संकटात देखील आपली श्रद्धा ढळत नाही तेव्हा त्याचे फलस्वरूप गोडच असते.. वरील लीलेत कणसे खाण्यासाठी सर्व आली पण मध माश्या आल्यावर सर्वजण पळून गेली.. श्री बंकटलाल मात्र त्याही स्थिती मध्ये श्री महाराजांकडे जाण्यासाठी तयार होते.. त्याचे फलस्वरूप श्री महाराजांनी माश्याना आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा दिली.. श्री बंकटलाल यांची भक्ती फारच उच्चतम होती.. यातून हाही बोध आपणस मिळतो कि एखादा संकटात असेल तर त्याला मदत करा कारण आज आपण त्याला केलेली मदत हि देखील सेवेचा एक भाग आहे.. इथे कदाचित आपल्यात मनात येइल कि आर्थिक मदत का ? आर्थिक मदत असे नाही तर आपण इथे मानसिक मदत करू शकतो.. आत्म बळ वाढवू शकतो.. मदत हि अनेक प्रकारे होऊ शकते फक्त मदत करताना आपले तसेच समाजाचे तसेच ज्याला आपण मदत करत आहोत त्याचे नुकसान तर होत नाही ना याची देखील आपणस भान ठेवायचे आहे.. चला तर मग आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया –हे समर्था.. आजची तुझी लीला म्हणजे भक्तीचा पाठच म्हणावी लागेल.. आजच्या लीलेतून संकटकाळी सुद्धा कशी भक्ती करावी याची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद…जसे भक्ती भाव बंकटलाल यांच्या हृदयात प्रगट झाले.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव.. हे मध माश्यानो आज पर्यंत आम्हीं आपणस फक्त आपण चावता एवढेच लक्षात ठेवल.. पण मधाची मधुरता तुमच्या शिवाय शक्य नाही हि शिकवण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. कोणतेही संकट येवो.. आपल्यातील मधुरता आम्हाला आठवावी हीच समर्था प्रार्थना

 


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......