१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

Oct 16, 2022 | चरित्र, मराठी

Share

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना वंदन करत आहेत.. ते म्हणत आहेत प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करताना जो आनंद होत तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.. यात मला जो आनंद प्राप्त होत आहे त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही… श्री गणपती बाप्पा मला या कार्यात यश द्या.. भगवान श्री नारायण यांचा निवास माझ्या ह्रदयात आहे.. भगवान श्री शंकराची माझ्यावर कृपा आहे.. सद्गुरूच्या चरणी वंदन करत आहे.. ज्याच्या हृदयात गुरूंचा वास आहे त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो.. हा अंधार नाहीसा झाल्याशिवाय सत्याचे दर्शन होऊ शकत नाही..ब्राम्हणांच्या चरणी वंदन असो.. संत हे स्वतः दुःख सहन करतात परंतु समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात.. म्हणूनच संत हे वंदनीय आहेत.. संत म्हणजे चालते बोलते तीर्थ क्षेत्रच… जो मनुष्य संतांच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते.. याचा फायदा काय तर कावळे देखील कोकिळे प्रमाणे बनतात.. कारण सत्संगाचा महिमाच असा आहे.. स्व उद्धार करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.. सत्संगती ने जसे परीस मुळे लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे आपल्यातील अवगुणांचा ऱ्हास होतो.. आपला उद्धार होतो.. संतांचा महिमा वर्णन करताना सर्वांचीच मती कुंठित होते.. ज्याचा कोणी मित्र नाही , शत्रू नाही.. कुना बाबत मनात किंतु परंतु नाही अश्या संतांच्या चरणी वंदन असो.. संत हे जगाचे हित करण्यासाठी झटत असतात..  अश्या संतांना मी प्रार्थना करतो कि श्री रामचे चरित वर्णन करण्याची शक्ती मला द्या… भक्ती द्या..दुष्ट प्रवृतीना सुद्धा मी वंदन करतो.. त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा दुष्टमधील दुष्ट पणा खरे तर स्वतःचे नुकसानच करतो जसे गारा पडल्याने नुकसान होते पण त्या गारा सुद्धा नंतर स्वतः नष्ट होतात त्या प्रमाणे आपल्यातील दुष्ट पणा आपला नाश अधिक करतो.. संत आणि दुष्ट दोघाच्या चरणी वंदन आहे.. दोघेही लोकांना दुःख देतात.. दुष्ट आपल्या वाईट कर्माने तर संत त्यांच्या वियोगाने लोकांना दुःख देतात.. आपण सर्वानी जे चांगले आहे ते सर्व घ्यावे… आपणास कसा संग  मिळतो त्या प्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून आपण नेहमी सत्संगाची कास धारावी …सर्वांमधील चैतन्याला वंदन असो.. सर्व जीवांना वंदन असो.. प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र अगाध आहे ते वर्णन करण्याची बुद्धी मला प्राप्त होवो.. ज्याप्रमाणे लहान बाळाचे बोल हे आई वडील समजून घेतात तसेच आपण हि माझी वाणी समजून घ्यावी.. हि कथा ऐकून सर्वजण सुखी होतील यात काही शंकां नाही.. मनात कोणतेही तर्क वितर्क ना लावता हि कथा श्रवण करावी तरच ती समजू शकेल.. कोणत्याही गोष्टीला राम नामाशिवाय शोभा नाही.. या मध्ये नेमके काय आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर यात प्रभू श्री रामाचा प्रताप .. महिमा आहे .. प्रभू श्री रामाची कथा हि कल्याण करणारी अशी आहे.. गाईचे दूध हे जसे पोषक असे असते मग ते काळ्या गाईचे असो वा इतर कोणत्याही तसेच प्रभू श्री रामचंद्रांची कथा हे सर्वांना प्रेरणा देणारी अशी आहे.. प्रभू श्री रामाचे चरित्र हे गुणांची खान आहे परंतु ती फक्त इतरांना सांगण्यासाठी आहे का तर नाही ती आपल्या जीवनांत आचारणात आणण्यासाठी आहे.. मी काही कवी नाही नाही वा लेखक हि नाही तरी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे… कारण शास्त्रा नुसार आपण जाणताच भजनाचा महिमा किती अगाध आहे… मग प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र वर्णन करण्याचा मोह मी कसा सोडू… भगवंत एकच आहे.. ज्याला आपण निराकार निर्गुण म्हणत असतो तो वेळोवेळी मनुष्य शरीर धारण करत असतो.. उद्दिष्ट असते जगत कल्याण.. अश्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून प्रभू श्री रामाची कथा आरंभ करत आहे… सुरुवातीला हि कथा व्यास वाल्मिकी यांनी सांगितली आहे… त्यावरच मी वर्णन करत आहे… ज्या सर्व कवींनी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे त्या सर्वांनां वंदन करत आहे… आपण सर्वानी माझ्यावर कृपा करावी.. ज्या वाल्मिक ऋषींनी हि रचना केली त्यांच्या चरण कमलानं वंदन असो.. चारही वेदांना वंदन असो… ब्रम्ह देवांच्या चरणी वंदन असो… श्री गंगा मातेच्या चरणी वंदन असो… श्री शंकर पार्वती… माझे माता पिता यांच्या चरणी वंदन असो… आयोध्या पुरीला वंदन असो.. शरयू नदीला वंदन असो… पर्व दिशेला वंदन असो राजा दशरथ व त्यांच्या राण्यांना वंदन असो… राजा जनकाला हि वंदन असो… राजा भरताच्या चरणी वंदन असो… लक्ष्मणाच्या चरणी वंदन असो… कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण यांना वंदन असो.. हनुमानाच्या चरणी देखील वंदनवानरांचे राजा सुग्रीव , अस्वलांचे राजे जांबवान राक्षस राजे बिभीषण आणि अंगद यांच्या चरणी वंदन… सर्व प्रभू श्री रामाचे उपासक सेवक सर्वांच्या चरणी वंदन.. शुकदेव , सनकादि , नारदमुनी या सर्वांनां वंदन आपण कृपा करा… जानकीमातेच्या चरणी वंदन… श्री सीता रामचंद्रच्या चरणी वंदन .

अश्या प्रकारे तुलसीदासांच्या मंगलाचरण केले आहे.. धन्यवाद तुलसीदास महाराज आपण आम्हाला हे मंगलचरण समजण्याची बुद्धी दिलीत.. असेच आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र समजण्याची बुद्धी द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना


Share
और पढिये !!

डिजिटल दुनिया –

डिजिटल दुनिया - आज का युग डिजिटल युग है .. हम सभी डिजिटल हो गए है ... एक समय था की हम एक दूसरे से  सवांद करने के लिए कई महीने- साल रुकना पड़ता था... क्यूंकि लोगों को एक गांव से दूसरे गांव संदेशा  देने के लिए  किसीको भेजना पड़ता था ..बाद में संदेशा  भेजने के लिए पत्रों...

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी  - गणेश भक्तोंका एक व्रत  है जिसे संकष्टी चतुर्थी  कहाँ  जाता है ! अनेक भक्त यह व्रत करते है ! इस व्रत के पीछे बहोत सी कथाये है ! अभी हम गणेश पुराण में जो कथा है वो यहाँ देखते है ! कृतवीर्य  नाम के राजा थे वे एक परिपूर्ण ऐसे राजा थे ! उनकी पत्नी का नाम...

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ की जाती है ?

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ  की जाती है ? वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कार्य कोनसा भी हो उस कार्य का आरंभ भगवान् श्री गणेश जी की पूजा से किया जाता है ! यह प्रथा बरसो से चल रही है और चलती रहेगी जब हम...

कीर्तन भक्ति – नवविधा भक्ति

नवविधा भक्ति का दूसरा प्रकार कीर्तन भक्ति...सचमें कीर्तन करना भी भगवद भक्ति में आता है यह हमारे लिए कितनी आनंददाई बात है... कीर्तन भक्ति यानी ईश्वर के गुण, चरित्र, नाम, पराक्रम आदि का आनंद से सबके साथ कीर्तन करना... अब हम पहले भक्ति में श्रवण करते है... जो भी कुछ...

गजानन महाराज चरित्र दर्शन 6

श्री महाराज इन्होंने भोजन किया पीताम्बर ने लाया हुवा पानी पिया उसके बाद श्री महाराज बंकट लाल को बोलते है..तुम्हारे जेब में जो सुपारी है वो दो हमको ..श्री महाराज ने ऐसे बोलते ही श्री बंकट लाल ने जेब से सुपारी निकालकर श्री महाराज को दी उसी जेब में..दो पैसे थे वो भी।उसने...

श्रवण भक्ति – नवविधा भक्ति

हमारी संस्कृति  में भक्ति के नौ प्रकार बताये गए है... इस प्रकार में सर्वप्रथम आती है श्रवण भक्ति... हर एक भक्ति पद्धति अलग अलग होती है... लेकिन श्रवण भक्ति सभी लोग जाने अनजाने में करते ही है...इसके बारे में श्री समर्थ रामदास स्वामी कहते है " प्रथम भजन ऐंसे जाण |...

स्मार्ट फ़ोन या सेल्फी फ़ोन

स्मार्ट फोन से हम  स्मार्ट बन गए.. सच  में स्मार्ट फ़ोन की वजह हम अनेक यादे फोन में चित्रित कर सकते है... यह हमें मिला हुवा वरदान ही है... क्यूंकि १५ साल पहले फोटो निकले के लिए  हमें फोटो स्टुडिओ जाना पड़ता था... आज हम जहाँ जायेंगे वहाँ फोटो निकाल सकते है.. वो फोटो...

श्री गजानन महाराज दर्शन लीला ०५

श्री बंकटलाल और पीतांबर  शिंपी  कीर्तन सुनने गए थे... लेकिन उधर ह उनको श्री गजानन महाराज दिखे... फिर क्या वो कीर्तन छोड़कर श्री महाराज के पास आ गए... उन्होंने श्री महाराज जी से पूछा...की आपको खाना लावू क्या? तब श्री महाराज उन्हें बोले आपको जररूत होंगी तो मालिनी के घर...

गजानन महाराज चरित्र दर्शन 4

श्री गजानन महाराज जी के दर्शन क प्यास जगी श्री बंकटलाल जी के मन में   श्री गजानना चरित्र दर्शन ४ - श्री बंकटलाल जी को पूर्ण विश्वास था की श्री गजानन महाराज जी ब्रम्हांड नायक है... अब उनके मन में श्री दर्शन की प्यास जग गई थी... उनको भूख प्यास मीट  गई थी... उनकी...

नवरात्र व आपली प्रगती

  नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी...आपण अनेक सण- वार साजरे करतो... करत आहोत... आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे... आपण दरवर्षी नवरात्र साजरी...