१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

Oct 16, 2022 | चरित्र, मराठी

Share

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना वंदन करत आहेत.. ते म्हणत आहेत प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करताना जो आनंद होत तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.. यात मला जो आनंद प्राप्त होत आहे त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही… श्री गणपती बाप्पा मला या कार्यात यश द्या.. भगवान श्री नारायण यांचा निवास माझ्या ह्रदयात आहे.. भगवान श्री शंकराची माझ्यावर कृपा आहे.. सद्गुरूच्या चरणी वंदन करत आहे.. ज्याच्या हृदयात गुरूंचा वास आहे त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो.. हा अंधार नाहीसा झाल्याशिवाय सत्याचे दर्शन होऊ शकत नाही..ब्राम्हणांच्या चरणी वंदन असो.. संत हे स्वतः दुःख सहन करतात परंतु समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात.. म्हणूनच संत हे वंदनीय आहेत.. संत म्हणजे चालते बोलते तीर्थ क्षेत्रच… जो मनुष्य संतांच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते.. याचा फायदा काय तर कावळे देखील कोकिळे प्रमाणे बनतात.. कारण सत्संगाचा महिमाच असा आहे.. स्व उद्धार करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.. सत्संगती ने जसे परीस मुळे लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे आपल्यातील अवगुणांचा ऱ्हास होतो.. आपला उद्धार होतो.. संतांचा महिमा वर्णन करताना सर्वांचीच मती कुंठित होते.. ज्याचा कोणी मित्र नाही , शत्रू नाही.. कुना बाबत मनात किंतु परंतु नाही अश्या संतांच्या चरणी वंदन असो.. संत हे जगाचे हित करण्यासाठी झटत असतात..  अश्या संतांना मी प्रार्थना करतो कि श्री रामचे चरित वर्णन करण्याची शक्ती मला द्या… भक्ती द्या..दुष्ट प्रवृतीना सुद्धा मी वंदन करतो.. त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा दुष्टमधील दुष्ट पणा खरे तर स्वतःचे नुकसानच करतो जसे गारा पडल्याने नुकसान होते पण त्या गारा सुद्धा नंतर स्वतः नष्ट होतात त्या प्रमाणे आपल्यातील दुष्ट पणा आपला नाश अधिक करतो.. संत आणि दुष्ट दोघाच्या चरणी वंदन आहे.. दोघेही लोकांना दुःख देतात.. दुष्ट आपल्या वाईट कर्माने तर संत त्यांच्या वियोगाने लोकांना दुःख देतात.. आपण सर्वानी जे चांगले आहे ते सर्व घ्यावे… आपणास कसा संग  मिळतो त्या प्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून आपण नेहमी सत्संगाची कास धारावी …सर्वांमधील चैतन्याला वंदन असो.. सर्व जीवांना वंदन असो.. प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र अगाध आहे ते वर्णन करण्याची बुद्धी मला प्राप्त होवो.. ज्याप्रमाणे लहान बाळाचे बोल हे आई वडील समजून घेतात तसेच आपण हि माझी वाणी समजून घ्यावी.. हि कथा ऐकून सर्वजण सुखी होतील यात काही शंकां नाही.. मनात कोणतेही तर्क वितर्क ना लावता हि कथा श्रवण करावी तरच ती समजू शकेल.. कोणत्याही गोष्टीला राम नामाशिवाय शोभा नाही.. या मध्ये नेमके काय आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर यात प्रभू श्री रामाचा प्रताप .. महिमा आहे .. प्रभू श्री रामाची कथा हि कल्याण करणारी अशी आहे.. गाईचे दूध हे जसे पोषक असे असते मग ते काळ्या गाईचे असो वा इतर कोणत्याही तसेच प्रभू श्री रामचंद्रांची कथा हे सर्वांना प्रेरणा देणारी अशी आहे.. प्रभू श्री रामाचे चरित्र हे गुणांची खान आहे परंतु ती फक्त इतरांना सांगण्यासाठी आहे का तर नाही ती आपल्या जीवनांत आचारणात आणण्यासाठी आहे.. मी काही कवी नाही नाही वा लेखक हि नाही तरी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे… कारण शास्त्रा नुसार आपण जाणताच भजनाचा महिमा किती अगाध आहे… मग प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र वर्णन करण्याचा मोह मी कसा सोडू… भगवंत एकच आहे.. ज्याला आपण निराकार निर्गुण म्हणत असतो तो वेळोवेळी मनुष्य शरीर धारण करत असतो.. उद्दिष्ट असते जगत कल्याण.. अश्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून प्रभू श्री रामाची कथा आरंभ करत आहे… सुरुवातीला हि कथा व्यास वाल्मिकी यांनी सांगितली आहे… त्यावरच मी वर्णन करत आहे… ज्या सर्व कवींनी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे त्या सर्वांनां वंदन करत आहे… आपण सर्वानी माझ्यावर कृपा करावी.. ज्या वाल्मिक ऋषींनी हि रचना केली त्यांच्या चरण कमलानं वंदन असो.. चारही वेदांना वंदन असो… ब्रम्ह देवांच्या चरणी वंदन असो… श्री गंगा मातेच्या चरणी वंदन असो… श्री शंकर पार्वती… माझे माता पिता यांच्या चरणी वंदन असो… आयोध्या पुरीला वंदन असो.. शरयू नदीला वंदन असो… पर्व दिशेला वंदन असो राजा दशरथ व त्यांच्या राण्यांना वंदन असो… राजा जनकाला हि वंदन असो… राजा भरताच्या चरणी वंदन असो… लक्ष्मणाच्या चरणी वंदन असो… कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण यांना वंदन असो.. हनुमानाच्या चरणी देखील वंदनवानरांचे राजा सुग्रीव , अस्वलांचे राजे जांबवान राक्षस राजे बिभीषण आणि अंगद यांच्या चरणी वंदन… सर्व प्रभू श्री रामाचे उपासक सेवक सर्वांच्या चरणी वंदन.. शुकदेव , सनकादि , नारदमुनी या सर्वांनां वंदन आपण कृपा करा… जानकीमातेच्या चरणी वंदन… श्री सीता रामचंद्रच्या चरणी वंदन .

अश्या प्रकारे तुलसीदासांच्या मंगलाचरण केले आहे.. धन्यवाद तुलसीदास महाराज आपण आम्हाला हे मंगलचरण समजण्याची बुद्धी दिलीत.. असेच आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र समजण्याची बुद्धी द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......