पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

Sep 9, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

डिजिटल दुनिया –

डिजिटल दुनिया - आज का युग डिजिटल युग है .. हम सभी डिजिटल हो गए है ... एक समय था की हम एक दूसरे से  सवांद करने के लिए कई महीने- साल रुकना पड़ता था... क्यूंकि लोगों को एक गांव से दूसरे गांव संदेशा  देने के लिए  किसीको भेजना पड़ता था ..बाद में संदेशा  भेजने के लिए पत्रों...

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी  - गणेश भक्तोंका एक व्रत  है जिसे संकष्टी चतुर्थी  कहाँ  जाता है ! अनेक भक्त यह व्रत करते है ! इस व्रत के पीछे बहोत सी कथाये है ! अभी हम गणेश पुराण में जो कथा है वो यहाँ देखते है ! कृतवीर्य  नाम के राजा थे वे एक परिपूर्ण ऐसे राजा थे ! उनकी पत्नी का नाम...

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ की जाती है ?

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ  की जाती है ? वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कार्य कोनसा भी हो उस कार्य का आरंभ भगवान् श्री गणेश जी की पूजा से किया जाता है ! यह प्रथा बरसो से चल रही है और चलती रहेगी जब हम...

कीर्तन भक्ति – नवविधा भक्ति

नवविधा भक्ति का दूसरा प्रकार कीर्तन भक्ति...सचमें कीर्तन करना भी भगवद भक्ति में आता है यह हमारे लिए कितनी आनंददाई बात है... कीर्तन भक्ति यानी ईश्वर के गुण, चरित्र, नाम, पराक्रम आदि का आनंद से सबके साथ कीर्तन करना... अब हम पहले भक्ति में श्रवण करते है... जो भी कुछ...

गजानन महाराज चरित्र दर्शन 6

श्री महाराज इन्होंने भोजन किया पीताम्बर ने लाया हुवा पानी पिया उसके बाद श्री महाराज बंकट लाल को बोलते है..तुम्हारे जेब में जो सुपारी है वो दो हमको ..श्री महाराज ने ऐसे बोलते ही श्री बंकट लाल ने जेब से सुपारी निकालकर श्री महाराज को दी उसी जेब में..दो पैसे थे वो भी।उसने...

श्रवण भक्ति – नवविधा भक्ति

हमारी संस्कृति  में भक्ति के नौ प्रकार बताये गए है... इस प्रकार में सर्वप्रथम आती है श्रवण भक्ति... हर एक भक्ति पद्धति अलग अलग होती है... लेकिन श्रवण भक्ति सभी लोग जाने अनजाने में करते ही है...इसके बारे में श्री समर्थ रामदास स्वामी कहते है " प्रथम भजन ऐंसे जाण |...

स्मार्ट फ़ोन या सेल्फी फ़ोन

स्मार्ट फोन से हम  स्मार्ट बन गए.. सच  में स्मार्ट फ़ोन की वजह हम अनेक यादे फोन में चित्रित कर सकते है... यह हमें मिला हुवा वरदान ही है... क्यूंकि १५ साल पहले फोटो निकले के लिए  हमें फोटो स्टुडिओ जाना पड़ता था... आज हम जहाँ जायेंगे वहाँ फोटो निकाल सकते है.. वो फोटो...

श्री गजानन महाराज दर्शन लीला ०५

श्री बंकटलाल और पीतांबर  शिंपी  कीर्तन सुनने गए थे... लेकिन उधर ह उनको श्री गजानन महाराज दिखे... फिर क्या वो कीर्तन छोड़कर श्री महाराज के पास आ गए... उन्होंने श्री महाराज जी से पूछा...की आपको खाना लावू क्या? तब श्री महाराज उन्हें बोले आपको जररूत होंगी तो मालिनी के घर...

गजानन महाराज चरित्र दर्शन 4

श्री गजानन महाराज जी के दर्शन क प्यास जगी श्री बंकटलाल जी के मन में   श्री गजानना चरित्र दर्शन ४ - श्री बंकटलाल जी को पूर्ण विश्वास था की श्री गजानन महाराज जी ब्रम्हांड नायक है... अब उनके मन में श्री दर्शन की प्यास जग गई थी... उनको भूख प्यास मीट  गई थी... उनकी...

नवरात्र व आपली प्रगती

  नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी...आपण अनेक सण- वार साजरे करतो... करत आहोत... आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे... आपण दरवर्षी नवरात्र साजरी...