पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

Sep 9, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......