श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

May 8, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले… परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचे प्रमाण इतके होते कि सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष होते. वाटेत अकोली नावाचे गाव होते. तिथे महाराज आले. महाराजांना खूप तहान लागली होती. महाराज ज्या रस्त्याने जात होते तिथे भास्कर नावाच्या शेतकरी आपल्या शेतात काम करीत होता. भास्कर ने स्वतःला पाणी पिण्यासाठी एक घागर पाणी आणले होते. श्री गजानन महाराज भास्कर च्या जवळ आले व पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पाजण्याचें खूप मोठे पुण्य आहे. पाण्याशिवाय प्राणाचे रक्षण होणे अशक्य आहे. मोठमोठे धनिक लोक पाणपोई द्वारे लोकांची तृष्णा भागवतात व पुण्य कमवतात. महाराजांच्या हि वाणी ऐकून भास्कर श्री महाराजाना म्हणाले आपण तर दिंगबर आपणस पाणी पाजून काय पुण्य मिळणार ? उलट जर अनाथ , पंगू , दुर्बल यांना पाणी पाजले तर पुण्य मिळेल हे शास्त्र वचन आहे. आपणास पाणी देऊन काय पुण्य मिळणार. मी आपणस पाणी देणार नाही. भास्कर हे बोलणे ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले व तिथून पुढे निघाले. थोडे पुढे गेल्या नंतर तिथे एक विहीर होती. महाराजांना तिकडे जाताना पाहून भास्कर म्हणाला अहो ती विहीर कोरडी आहे. आणि हसू लागला. महाराज त्याला म्हणाले अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण एक प्रयत्न करतो समाज हितासाठी पाहूया पाणी मिळते का ? महाराज विहिरी जवळ आले. विहीर पूर्णतः कोरडी होती. महाराज तिथेच असणाऱ्या एक वृक्षा काही ध्यान लावून बसले आणि त्यांनी प्रार्थना सुरु केली – हे देवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्न राघवा । हे विठ्ठला नरहरी । हे आकोली पाण्यावाचून त्रस्त झाली । ओलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून । मानवी यत्न अवघे हरिलें । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊली । पाणी दे या विहिरीला । महाराजांच्या प्रार्थनेचे रूपांतर कृपेत झाले. विहिरीला पाण्याचा पाझर फुटला आणि काही क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरली. महाराज त्या विहिरीचे पाणी पिले. हे सर्व पाहून भास्कर थक्क झाला आणि त्याला कळून चुकले महाराज नक्कीच कुणीतरी महान योगी आहेत. तो धावतच महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना क्षमा प्रार्थना करू लागला. हे नरदेह धारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।लेकरासी कृपा कर । अर्भक मी तुमचे । मी आपणस ओळखले नाही आणि आपणस अपशब्द बोललो मला माफ करा. महाराज तर कृपेचे सागर आहेत ते कधी आपल्या बालकांवर रागावतील का. उलट महाराज त्याला म्हणाले अरे तुला त्रास होत होता म्हणूनच विहिरी ला आणि आणले आहे. विहिरीला पाणी लागल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली अनेक गावकरी मंडळी तिथे आली. सर्वांनी एका स्वरात महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज कि जय!

बोध – खरंतर आजच्या लीलाच पूर्णतः बोध आहे. त्यावर वेगळा बोध लिहिणे आवश्यक नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. तरी देखील महाराजांना प्रार्थना करून आपण इथे बोध मांडण्याचा प्रयन्त करूया. आजची संपूर्ण लीला आपणस प्रार्थनेचे महत्व समजून सांगत आहे. जिथे कुठे आपला भक्त अडचणीत असेल तिथे परब्रह्म आपली मदत करण्यासाठी येत असते. या लीलेत श्री भास्कर हे देखील कोणत्या तरी देवाची भक्ती , सेवा करत असतील. त्यामुळेच परब्रम्ह श्री गजानन महाराज लीलेचे निमित्त करून त्यांच्या साठी धावून आले. कारण महाराजच श्री राम , श्री कृष्ण , विठ्ठल आहेत. आपण ज्या कोणत्या देवाची भक्ती करतो त्यांची नावे विविध आहेत पण परब्रम्ह मात्र एकच आहे. महाराजांनी भास्कर यांना पाणी मागितले पण भास्कर ने आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे महाराजांनाच आपले विचार सांगितले. महाराज त्यांना काहीच बोलले नाहीत कारण महाराजांची प्रत्येक लीला म्हणजे कृतीतून अनुभूती. इथे महाराजां नी स्वतः प्रार्थना केली. इथे महाराज आपणस प्रार्थनेची शक्ती समजवून सांगत आहेत. महाराजांनी प्रार्थना करून विहिरीस पाणी आणले. थोडक्यात महाराज आपणस सकारात्मक प्रार्थना करण्याची शिकवण देत आहेत. महाराज भास्करला म्हणत आहेत कि तुझ्या साठीच पाणी आणले आहे म्हणजेच भास्कर ने सुद्धा देवाला अनेकदा प्रार्थना केली असेल कि भगवंता पाण्याचे दुर्भिक्ष दूर कर आणि त्यांच्या प्रार्थनेचे फलस्वरूप महाराजांनी १४ वर्षांपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीस पाणी निर्माण केले. इथे महाराज आपणस पाण्याचे महत्व देखील समजून सांगत आहे. पाणी म्हणजे जीवन. आज जे पाणी आहे ते जपून वापरा तसेच पाण्याचे स्तोत्र वाढवण्याची प्रेरणा महाराज आपणस देत आहेत.

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था.. आजची लीला म्हणजे प्रार्थना कशी करावी याची शिकवण आहे आमच्यासाठी.. ज्या प्रमाणे तू श्री भास्करराव यांच्याकडून प्रार्थना करवून घेतलीस व प्रार्थनेस निमित्त करून त्यांच्यावर कृपा केलीस अशीच कृपा आमच्यावर कर.. आमच्याकडून सकारात्मक प्रार्थना करवून घे.. तसेच आमच्याकडून पाण्याचे स्तोत्र वाढावेत ह्या साठी आम्हाला निमित्त कर.. आमच्याकडून हि प्रार्थना करवून घेतलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...