श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 27, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेगांव चा बाजाराचा दिवस होता. त्या बाजारात अनेक पिंपळगावातील मंडळी गेली होती. त्याच बाजारात श्री बंकटलाल देखील आले होते. त्या दिवशी बाजारात अनेक लोकांच्या बोलण्यात येत होते कि आमच्या पिंपळगावात एक अवलिया आले आहेत. हा हा म्हणता हि बातमी संपूर्ण बाजारात पसरली. बंकटलाल यांच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांना मनातून खात्री वाटली कि नक्कीच ते आपले श्री गजानन महाराजच असणार. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पत्नी सहित पिंपळगाव गाठले. पाहतो तर काय साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजच होते. मग काय त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांनी महाराजांना वंदन केले. महाराज आपण आता येतो म्हणून गेलात.. आज पंधरा दिवस झाले महाराज… आमचे काही चुकले काय .. महाराज तुमच्या विना शेगांव भणभणीत दिसत आहे.. सर्व सेवेकरी आपली वाट पहात आहेत.. बैल गाडी आणली आहे.. आपणस विनंती आहे.. आपण शेगांवास चलावे… माय लेकांची ताटातूट होणे बरे नव्हें… अनेक भक्त आपली वाट पहात आहेत… आपणस विनंती आहे आपण शेगांवी चलावे… बंकटलाल यांची प्रार्थना महाराजांनी स्वीकार केली आणि ते बैलगाडीत बसले. पिंपळगावतील लोकांना अश्रू अनावर झाले. बंकटलाल यांनी सर्व गावकर्यांना म्हणाले आपणस विनंती आहे. महाराजांना भेटण्यास आपण शेगांवी येत जावे तरी आपण आम्हाला निरोप द्यावा. काही अंतर गेल्या नंतर श्री गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले. हि सावकाराची रीत असते का ? दुसऱ्याचा माल बळजबरीने न्यावा मला तर तुझ्या घरी येण्यास भीती वाटते. महालक्ष्मी जी जगद्जननी आहे जिची सर्वत्र सत्ता तिला सुद्धा तू कोंडून ठेवले आहे. तिथें माझे काय ? म्हणून मी निघून गेलो होतो. महाराजांची हि वाणी ऐकून बंकटलाल खूपच विनय पूर्वक महाराजांना म्हणाले महाराज. महाराज माझ्या कुलुपाला ती जगन्माता भ्याली नाही तर तुमचा वास तिथे आहे म्हणून ती माझ्याकडे स्थिर ( चिरकाल ) आहे. ज्या ठिकाणी आई असते तिथेच बाळ असते. महाराज आपल्या चरण कमला पुढे माझ्या साठी काहीच मौल्यवान नाही. आता माझे असे काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. माझी आपणस इतकीच विनंती आहे आपण शेगांवात रहावे. अशा रीतीने श्री गजानन महाराज पुन्हा शेगांवात आले. सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – खरंतर आजची लीला म्हणजे आपणस भक्ती कशी असावी हे आपणस समजण्यासाठी केलेली हि लीला आहे हाच बोध आपणास मिळत आहे. पहा ना बाजारात केवळ चर्चा झाली कि कुणीतरी अवलिया पिंपळगावात आले आहेत यावरून बंकटलाल यांच्या मनात लगेचच सकारात्मक विचार आला कि नक्कीच ते श्री गजानन महाराजच असणार. किती तो विश्वास आणि श्रद्धा आणि त्याचे फलस्वरूप खरोखर ते श्री महाराजच होते. आपणासही आपली भक्ती वाढवायची आहे. श्री बंकटलाल यांनी महाराजांना विनंती केली महाराज आपण शेगांवी चलावे.. यावरून आपल्या लक्षात येते कि श्री बंकटलाल यांची महाराजांच्या चरणी जी काही श्रद्धा… भक्ती होती किती उच्च असेल. कारण परब्रम्हाला आपल्या सोबत नेणें म्हणजे तितकेच त्यांचे सुद्धा आपल्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. यावरून आपणस आपले व महाराजांचे नाते कसे निर्माण झाले पाहिजे याची समज प्राप्त होते. काही अंतर गेल्या नंतर महाराज श्री बंकटलाल यांना म्हणतात मला तुझी भीती वाटते कारण तू लक्ष्मी मातेस बंदिस्त केले आहे… यावर श्री बंकटलाल म्हणतात महाराज जे कि आहे ते तुमचे आहे. तुम्ही आहात म्हणून जगद्जननी माझ्याकडे वास करत आहे. मला आपले चरण कमल सोडून काहीच नको. इथे खूप खोल असा संदेश महाराज देत आहेत. लक्ष्मी हि कमवलीच पाहिजे पण लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर आपले मन लगेचच त्याच गोष्टीला सर्वस्व मानते आणि इथेच गडबड होते. असे होऊ नये यासाठी बंकटलाल यांचे वाक्य आपणस नेहमी लक्षात ठेवायचे आहे. जी काही जगद्जननी लक्ष्मी मातेची कृपा आहे ती सर्व आपल्या महाराजांची कृपा आहे. कुठेच मला अहं भाव ठेवण्याची चूक करायची नाही.पहा हा भाव आपल्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी मातेचा वास असेल आणि आपल्या ह्रदयातून फक्त धन्यवाद चे भाव येतील… धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद . चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया

हे समर्था आजची तुझी लीला म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याचा आमच्या साठी प्रसादच आहे.. हा प्रसाद आम्हाला दिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… जशी श्री बंकटलाल यांना भक्ती प्राप्त झाली.. अशी भक्ती आमच्या ह्रदयात जागृत कर.. कारण हे सर्व तुझ्या कृपेशिवाय शकय नाही… तुझ्याच कृपेने आमच्या जीवनातं.. जगद्जननी श्री लक्ष्मी मातेचा वास आहे.. हि समज दिलीस त्या बद्दल धन्यवाद… हि जी समज आज प्राप्त झाली आहे ती आमच्या अंतर्मनात रुजव कारण आमचे मन कायम स्व चा नारा लावते आणि इथेच मी अडकतो.. कृपा कर मला या पासून वाचवं… आणि प्राप्त लक्ष्मीचा वापर योग्य पध्द्तीने करण्याची समज मला दे.. कारण तू भरपूर देतोस.. धन्यवाद समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......