श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 13, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित नसते. हीच स्थिती माधव यांची झाली .अचानकपणे त्याच्या आयुष्यात दुःखद घटना घडू लागल्या. अचानकपणे त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले . अचानकपणे घडलेल्या या गोष्टीमुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. ते पूर्णपणे एकाकी झाले. त्यांना एकदमच विरक्ती आली. आता ते देवाचा धावा करू लागले. त्यांच्या ह्रद्यातून प्रार्थना निघू लागल्या. हे परमेश्वरा हि माझी काय अवस्था झाली आहे. मी तर आयुष्यभर संसारच केला.कधी तुझे नाव घेतले नाही. आज तो संसार पूर्णपणे विस्कटला आहे. आता मला कुणीच नाही. आता माझा सांभाळ कोण करणार. हे परमेश्वरा तूच मला तारू शकतोस. अश्या प्रार्थना करता करता. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेगांवी येतात. श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी उपोषण सुरु केले. अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी हरी नाम सेवा सुरु केली. श्री गजानन महाराजांनी त्यांना सांगितले बाळा असे करू नकोस.अरे आज जी नाम सेवा करत आहेस ती आयुष्यभर का नाही केली ? ज्या पत्नी व मुलांसाठी तू आयुष्यभर संसार केलास ते तर तुला सोडून गेले. आता तुला परमार्थ आठवत आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते. महाराज त्याला म्हणाले हट्ट करू नकोस भोजन करून घे. तिथे उपस्थित लोक होते त्यांनी देखील भोजन करण्यासाठी विनंती केली परंतु त्याने कुणाचेच ऐकले नाही. अन्न त्याग करून तो तसाच समर्थांच्या सानिध्यात हरी नाम घेत बसून राहिला. आता रात्रीची वेळ झाली सर्वजण झोपले होते. माधव हि तिथेच झोपला होता. महाराजांनी यम स्वरूपात माधव यांस स्वप्नात दृष्टांत दिला. यमाचे ते महा भयंकर रूप पाहून माधव घाबरले. त्यांना धडकी भरली. छाती धडधडु लागली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे सर्व पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले व माधवास म्हणाले अरे स्वतःला धीट म्हणतोस आणि काळाला घाबरतोस. असाच एक दिवस काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. तुला त्याचे दर्शन घडवले आहे.महाराजांची हि वाणी ऐकताच.. माधव विनंती पूर्वक महाराजांना म्हणाला. यमलोक नको. तेवढी यात्रा टाळा. वैकुंठ प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. माधवाची प्रार्थना ऐकून श्री महाराज हसू लागले व म्हणाले अरे मृत्यू समोर येताच हरी नाम घेत आहेस . जर अजून तुझी जगण्याची इच्छा असेल तर आयुष्य वाढेल. तेव्हा श्री माधव म्हणाले महाराज आता आयुष्य नको इतकीच इच्छा आहे कि उर्वरित आयुष्य आपल्या चरणकमलात जावे व शेवटचा श्वास आपली सेवा करता करता व्हावा. महाराजांनी श्री माधव यांची इच्छा पूर्ण केली व महाराज तथास्तु म्हणाले. अश्या रीतीने श्री माधव यांचे देहावसन श्री महाराजांच्या सानिध्यात झाले.
बोला श्री गजानन महाराज कि जय ! 

बोध – खरंतर वरील लीला हि आपल्या सर्वांच्या डोळयातील अंजन अशी आहे. बोध वर मनन करण्यापूर्वी श्री माधवराव यांना नमन करूया कारण त्यांना माध्यम करून समर्थ आपणस बोध देत आहेत. वरील लीलेत श्री माधवराव हे आयुष्यभर संसारात गर्क होते. संसार करत असताना त्यांना केवळ संसारात लक्ष होते. त्यांच्या मुखात कधीच हरी नाम आले नाही. संसार करता करता त्याच्या वयाची ६० वर्षे गेले. अचानकपणे त्यांच्या संसारात दुःख आले त्यांची पत्नी व मुलगा यांचे निधन झाले. आकस्मिकपणे झालेल्या घटने मुळे त्यांना एकदम संसारातून विरक्ती आली आणि ते हरी नामाकडे वळाले. खरंतर आयुष्य संसारात गेले होते. अचानकपणे हरी नाम घेणे सुद्धा त्यांना जड जात होते. पण काही तरी पुण्याई असावी त्यांना श्री गजानन महाराज भेटले. महाराज भेटले तरी त्याचा अट्टाहास सुरूच होता. कारण श्री महाराजांना ओळखण्याची दृष्टी नव्हती. आपले देखील असेच होते. आपण संसार करत असताना आपल्या मुखात हरी नाम येत नाही. तसेच आपले मन देखील सबब देते कि नाम घेण्यासाठी वेळ नाही. असे करत करत आपल्या संसाराचा गाडा सुरु असतो. काही समस्या आली कि आपण तेवढ्यापुर्ती हरी नाम सेवा करतो. समस्या सुटली कि परत संसारात गर्क होतो. खरंतर आपल्या जीवनात एखादी समस्या व संकट येते ते या साठी असते आपल्याला हरी नामावर स्थिर करण्यासाठी. संकट आपल्याला घडवत असते पण आपले मन नेहमी संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. श्री माधवराव यांची पुण्याई होती म्हणून त्यांना वार्धक्यात देखील हरी नाम घेता आले. आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून आपणस श्री महाराजांच्या कृपेने त्या लीलेस माध्यम करून श्री महाराज आता पासून हरी नाम घेण्यास सांगत आहेत. श्री माधवराव यांना यम स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर श्री महाराजांनी दिले .या यम स्वरूप दर्शनातून महाराज आपणस सांगत आहेत . बाळांनो प्रत्येक क्षणी काळ जवळ येत आहे परंतु आपणस त्याचा विसर पडला आहे. काळ कधी येईल व घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. काळ येण्याआधी आपणस हरी नामात दंग व्हायचे आहे. म्हणजेच आपल्या ह्रदयातील नामावर स्थिर व्हायचे आहे. या साठी सातत्य हा गुण आवश्यक आहे . श्री माधव राव यमलोक नको तर वैकुंठ हवा आहे असे म्हणत आहेत म्हणजे काय तर प्रत्येक श्वास हा हरी नामात जावा हि प्रार्थना ते करत आहेत म्हणजेच आपणस ते समज देत आहेत कि प्रत्येक श्वास हा हरी नाममय व्हावा !
चला तर मग आपण सर्व जण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था तुझी प्रत्येक लीला तर बोधच आहे.. परंतु आमचे मन तिला फक्त लीला वा गोष्ट म्हणून घेते.. आजच्या लीलेस माध्यम करून आम्हाला संसार व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी याची शिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आमचे मन संकट व दुःख आले तरच तुझे नाम घेते… आमच्या वर कृपा कर व आमच्या मनाला सदैव तुझ्या नामात दंग कर… आमचा प्रत्येक श्वास हा तुझ्या नामाचा दास असावा.. नामरूपी वैकुंठात आम्हाला स्थिर कर… कारण तुझे नामच सत्य आहे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !!

 


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......