श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 6, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

उन्हाळ्याचे दिवस होते… श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते…त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता… तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता… आंब्याचे दिवस होते… त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते… महाराजांनी एक दोन आंब्याच्या फोडी खाल्या… अचानक श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस म्हणाले… चंदू मला आंबे नकोत… तुझ्या घरी उतरंडीला दोन कान्होले ठेवले आहेत ते घेऊन ये… मला ते खायचे आहेत…श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज कान्होले नाहीत घरी तयार…आपली अनुमती असेल तर मी ताजे कान्होले तयार करून आणतो… श्री महाराज चिडून म्हणाले… गुरूंशी खोटे बोलू नकोस… जा लवकर… उपस्थित लोकांनी चंदू ला सांगितले कि महाराज अंगात आहेत त्या प्रमाणे घरी जाऊन पहा… श्री श्री चंदूमुकीम घरी जाऊन आपल्या पत्नीस सर्व सांगतात… तेव्हा त्यांची पत्नी म्हणते… अहो एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.. आपल्या घरात कान्होले नाहीत… ती म्हणाली अहो आपल्या घरात सर्व सामान आहे… मी लगेचच ताजे कान्होले तयार करते… तेव्हा श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज म्हणत आहेत त्या प्रमाणे तू उतरंडीला तपासून पहा… असे म्हण्टल्या नंतर एकदम तीला आठवेल आणि ती तिच्या पतींना म्हणाली..समर्थ जे म्हणत आहेत ते खरे आहे… अहो मी खापराच्या कळशीत २ कान्होले ठेवले होते… व ती कळशी उतरंडीला ठेवली आहे… परंतु ते कान्होले आत खराब झाले असतील… श्री चंदूमुकीम यांनी उतरंडी वरील ती खापराच्या कळशी काढली… ती कळशी काढून त्यातील कान्होले पाहले तर.. ते कान्होले ताजे तवाने होते.. ते खराब झाले नव्हते… ते कान्होले घेऊन ते लगेच महाराजांकडे जातात… सर्वांना महाराजांच्या वाणीचा अनुभव येतो … सर्वजण एका घोषात महाराजांचा जय जयजय कार करतात !!

बोध – वरील लीला म्हणजे महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाची अनुभूती देणारी लीला आहे…उपरोक्त लीलेत उतरंडीस कान्होले ठेवले होते… उतरंडी म्हणजे अशी जागा कि सहसा आपले लक्ष जात नाही … खरंतर वरील लीला एक निमित्त आहे आपल्याला समज देण्यासाठी… जसे कान्होले होते घरातच पण त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते… त्याच प्रमाणे आपल्या मध्ये देखील काही नकारात्मक गुण असतात जे आपल्या मनाने झाकलेले असतात त्याचे आपणस कधी दर्शन होत नाही… महाराज आपल्या जीवनात दुःख संकट देऊन आपणस काम करण्याची संधी देत असतात.. पण जसे वरील लीलेत श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस सांगत होते उतरंडीस कान्होले आहेत ते मला हवे आहेत… पण श्री चंदूमुकीम यांचे नकारात्मक मन त्यास विरोध करत होते… पण त्यांची भक्ती उच्चतम होती त्यामुळे त्यांना महाराजांच्या अंतःसाक्षित्वाची अनुभूती आली.. आपण हि श्री चंदूमुकीम यांच्या प्रमाणे विरोध करतो… आणि आपल्यातील नकारात्मक सवयी… विचार यावर काम करण्यास तयार होत नाही… आणि आपण आलेले संकट वा दुःख यांस केवळ नकारात्मक विचारांतून पाहतो … त्यामुळे आपल्यातील भक्ती ची पातळी खालावते… खरंतर आपल्या जीवनात जर संकट वा दुःख आले तर आपणस वरील लीलेतील उतरंडी ची आठवण करायची आहे… जी आपणस सांगत आहे… दुःख व संकट फारच कमी आहे… फक्त गरज आहे थोडेसे वरती डोकावून पाहण्याची… जर आपण आपले विचारात सकारात्मकता आणली तर… जसे श्री चंदूमुकीम यांना खापराच्या कळशीत कान्होले सापडले तसे… आपल्या जीवनात देखील यशरूपी कान्होले आपणस प्राप्त होतील… धन्यवाद महाराज … कोटी कोटी धन्यवाद !!
चला आपण त्यासाठी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था आजची तुझी लीला तर आमच्या साठी दृष्टिदान आहे… आम्ही तर नकारात्मक विचार करतो.. पण वरील लीलेतून तू आम्हास संकटाकडे पाहण्याची दृष्टी दिलीस त्या बद्दल धन्यवाद… इथून पुढे आम्ही प्रत्येक संकटाकडे वा दुःखाकडे नव्या आशेच्या किरणाने पहावे अशी दृष्टी आम्हाला दे… एक संधी म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहण्याची बुद्धी दे… हे समर्था हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...