कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि तितक्यात चमत्कार झाला कृष्णाप्पाने हालचाल केली आणि जिवंत झाला.. सर्वांनी आनंदाने स्वामींचा जयजयकार केला ..धन्य स्वामी !! धन्य स्वामी लीला !! बोला स्वामी महाराज कि जय हो !!
स्वामी भक्त हो..अनेकदा आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की आपण हताश होतो..आपणास असे वाटते की सर्व काही संपले आहे…आपण शरीराने असतो..पण मनाने हताश झालेले असतो…खरतर अश्या वेळेस आपणास मनाला सांगता आले पाहिजे…किंबहुना आपल्या अंतर्मनात हे रुजवावे… जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा..वरील लीला वाचताना श्रवण करताना आपणास अनेक प्रश्न निर्माण होतात…असे कसे…पण आपण जेव्हा आपण श्रध्दा पूर्वक या लीले कडे पाहू तेव्हा आपणास जाणवते..की ही लीला आपल्या साठी आहे…संकट किंवा अडचण असते तेव्हा आपली अवस्था ही मृत कृष्णप्पा सारखी असते..आपण शरीराने जिवंत असतो..पण मानसिक दृष्ट्या मृत असतो…अश्या वेळेस आपणास काय करायचे आहे..चोळप्पा महाराज प्रमाणे स्वामी चरणी लीन व्हायचे आहे…मुखी स्वामी नाम घ्यायचे…आणि मनाला तारक मंत्राची आठवण करून देत…प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे..एकदा आपले मन जिंकले की आपण ही कृष्णाप्पा प्रमाणे आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाना सामोरे जावू आणि यशस्वी होऊ…म्हणजेच मृत्यु येण्यापूर्वी आपण मरणार नाही तर लढणार…(इथे महत्वाची गोष्ट..ज्या दिवशी आपला मृत्यू आहे तेव्हा तो येणारच आहे..फकत जिवंत पणी लढून जिंकायचे आहे…धन्यवाद स्वामी
संदर्भ: स्वामी वाणी ३
www.chetnakeswar.com
स्वामी भक्त हो..कितीही संकटं येऊ द्या..पण जीवंतपणे मनाने हरू नका…कारण स्वामी भक्त हरत नाही..तर लढतो आणि संकटाचा सामना करून यशस्वी होतोच… धन्यवाद स्वामी…!
www.chetnakeswar.com