शिव पुराण कथा ३

Oct 5, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 3

आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते…पार्वती माता ने तर तिला आपल्या सखी चे स्थान दिले…एके दिवशी ती पार्वती माते जवळ जाते आणि विनम्र भावनेने प्रार्थना करू लागली..तिच्या प्रार्थनेतील भाव इतका खोल होता की पार्वती माता..तिला म्हणाल्या की अग सखे तुला काय हवे आहे..जे हवे ते माग… तेव्हा ती म्हणाली की माझी तर मुक्ती झाली पण माझे पती कुठे आहेत..त्यांच्या कडून अनेक चुका झाल्या आहेत…तेव्हा पार्वती माता सांगतात..तुझा पती..विंध्य पर्वतावर..पिशाच्च योनीत दुःख भोगत आहे…चंचुला हिला फार वाईट वाटले आणि तिने आपल्या पतीच्या उद्धार होण्यासाठी काय मार्ग आहे तो सांगण्याची विनंती केली…पार्वती माता सांगतात की जर त्याने शिव पुराण कथा श्रवण केली तर तो मुक्त होईल..चंचुला विचारते हे कसे शक्य आहे…हे तर आपणच करू शकता..तेव्हा पार्वती माता..शिव कीर्ती गाणारे जे गंधर्वराज तुंबूर होते त्यांना बोलावले…व सांगितले की तुम्ही या चंचुला बरोबर…विंध्य पर्वतावर जा…आणि तिथे एक पिशाच्च आहे त्याला प्रयत्न पूर्वक  शिव पुराण ची कथा ऐकवा…जेणेकरून त्याचे ह्रदय शुद्ध होईल…आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त होईल…गंधर्व तुंबूर पार्वती मातेची आज्ञा घेऊन..चंचुला बरोबर विंध्य पर्वतावर जातात..तिथे त्या पिशाच्च दिसतो.. त्याच्या समोर शिव पुराण कथा सुरू करतात…शिव कथा ऐकून त्याचे चित्त शुद्ध झाले आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त झाला..दोघे पती पत्नी शिव भक्तीत तल्लीन झाले. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

बोध – पहा उपरोक्त लीलेत माता पार्वती यांनी चंचुला यांना सखी चे स्थान दिले.. पहा आपले आणि ईश्वराचे नाते हि मित्रत्वाचे झाले पाहिजे.. पहा त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक आहे.. पहा चंचुला हिने काय फक्त श्री शिव महा पुराण कथा श्रवण केली का ? नाही तिने आपल्यात जे काही दोष आहेत ते आधी घालवले त्यावर कार्य केले.. आपणास हि तसेच करायचे आहे.. आपले दोष आपल्याला दिसत नाही ते दिसले पाहिजे.. जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ आणि आपले आणि त्याचे नाते  मित्रत्वाचे होईल.. आता प्रत्येक मनुष्य हा कुटुंब वत्सल असतो.. ज्या प्रमाणे चंचुला हिने आपल्या पतीचा उद्धार व्हावा या साठी प्रयत्न केले.. इथे आपणस आपल्या कुटूंबासाठी करायचे आहेत.. आता ते कसे पहा सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करा आता आपली अडचण काय मी जसे वागतो तसे घरच्यांनी वागावे.. पण हे शक्य नसते कारण आपणच तसे करत नाही..मग याला उपाय काय तर आपण घरात सकारात्मक वातावरण तयार करा.. कोणतीही गोष्ट असो.. ती सकारात्मक पणे हाताळा    पहा नक्कीच आपल्या घरच्यांवर हि त्याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.. कारण शिव महा पुराण कथा असो वा कोणताही ग्रंथ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.. पण आपण त्यावर कार्य करत नाही.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

चला आपण सर्व श्री महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा ज्या प्रमाणे श्री पार्वती माता यांनी  चंचुला हिला सखी चे स्थान दिले.. त्याच प्रमाणे आम्हाला त्या पात्रतेचे बनव.. आम्हाला आमच्या स्वतःवर कार्य करण्याची प्रेरणा दे.. परिस्थिती कोणतीही असुदे आमच्या कडून सकारात्मक प्रतिसाद येऊ दे.. धन्यवाद महादेवा.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...