ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
हरिपाठ
स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची प्राप्ती होत नाही.. आता स्वर्ग म्हणजे काय.. याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार.. कल्पना वेगळी असणार आहे.. आपण इथे व्यवहारिक भाषेत अर्थ पाहूया.. जिथे कायम आनंद असतो तो क्षण म्हणजे स्वर्ग.. हे स्वर्ग सुख आपणस कधी प्राप्त होईल जेव्हा आपण हरी नाम घेऊ.. म्हणजेच माऊली आपणस नाम सेवा करण्यास सांगत आहेत.. जेव्हा आपण हरिपाठ करू म्हणजेच हरिपाठ चा प्रत्येक शब्द व्यहारात उतरवू तेव्हा आपणस स्वर्ग सुखाची अनुभूती येणार आहे.. त्यासाठी आपणस नाम सेवा करायची आहे.. नाम हे ज्या प्रमाणे आभाळात पाऊस भरला आहे त्या प्रमाणे नामात हरी कृपा आहे.. म्हणून माऊली सांगत आहेत.. नाम घ्या.. कोणतेही नाम घ्या पण .. रोज घ्या.. चला रोज स्वामी नाम घेऊया.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय