!!श्री स्वामी समर्थ!!
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..!
स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके वाचतो..त्याचे मंथन करा..ते मंथन कुठे करा आपल्या अंतर्मनात करा…आपण म्हणाल मंथन करून काय होईल..पहा..दूध आहे. ते तापवले की साय येते…मंथन झाले..दुधाचे.. दही केले की आंबटपणा येतो..मंथन झाले..दह्याचे.. ताक केले.. लोणी निघते…मंथन झाले..लोणी तापवले…की तूप निघते..दुधाचे तूप होण्याची प्रक्रिया…असेच जेव्हा आपल्या विचारांचे मंथन होईल..कधी जेव्हा आपण वाचन करू..श्रवण करू..तेव्हा..त्यात माऊली सांगत आहेत..हे मंथन करताना नको असणारा भाग सोडून द्या.. त्याचा मूळ गाभा धरा.. त्यावर कार्य करा..जसे दुधात तूप आहे..तसेच आपल्यातच सर्वकाही आहे..बाकी गोष्टीत अडकू नका.. पहा कसे जीवन होते..या सोबत महत्वाचे..नाम घ्या..कोणतंही घ्या..पण सातत्याने घ्या..पहा स्वामींना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!!