!!श्री स्वामी समर्थ!!
हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..!
स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत आहेत..पहा हा माझा स्वतःचा अनुभव आहे..याचे उत्तर ही स्वामींनी वरील ओवीतून दिले..धन्यवाद स्वामीं..आपण काय करतो आपले जे काही विचार आहेत ते इतर व्यक्तींवर लादण्याचा प्रयत्न करतो..पहा आपल्याला कारले फार आवडते.. मग आपण आपल्या घरातील सर्वांनी किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती ने कारले खाल्लेच पाहिजे हा आपण अट्टाहास करतो..कारण काय तर मला आवडते..अहो समोरील व्यक्तीला कांदा आवडतो मग तूम्हाला आवडतो का? याचे संमिश्र उत्तर असणार आहे…पहा कधी तरी आपल्या कडून काही तरी चूक होते तेव्हा आपण काय म्हणतो की मी चुकून बोललो..अहो तसेच समोरील व्यक्ती सुद्धा चुकून बोलू शकत नाही का? आपल्या मनात विचार येतात..या विचारांना प्रेरणा देणारी शक्ती आहे की नाही..कुणी तिला देव म्हणेल..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी अल्लाह म्हणेल..कुणी अजून काही म्हणेल..पण सर्वांना प्रेरणा देणारा स्रोत एकच आहे..म्हणजेच ती व्यक्तीला प्रेरणा देणारे स्वामीच आहेत..तर मग आपण कसे आपले विचार कुणावर लादू शकतो..हा इथे याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती चुकत आहे तरी आपण आपले मत मांडायचे नाही..आपले मत असे मांडा की समोरच्या व्यक्ती ला असे वाटू नये की आपण विरोध करत आहोत…धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद..!