स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५)
प्रेरणादायी बोल
हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!!
www.SwamiVaani.co.in
स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच सांगितलं आहे.. यश हवे असले तर कधीच शॉर्टकट नसतो… आपणा सर्वांना यश हवे आहे.. मग यश प्राप्त करण्यासाठी आपण काय करतो हे खूप महत्वाचे आहे.. जर आपणस शाश्वत यश हवे असेल तर आपणस कष्टच करावे लागतील.. पहा दोन विद्यार्थी आहेत.. दोघेही हुशार आहेत.. कारण ईश्वर सर्वाना समान बुद्धिमत्ता देतो.. एक विद्यार्थी रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो… त्या विषयावरील सर्व प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करतो.. म्हणजेच रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो.. दुसरा विद्यार्थी हा वर्ष भर अभ्यास करत नाही.. मात्र परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र जागरण करतो.. पहा जेव्हा निकाल लागेल तेव्हा कुणास घवघवती यश मिळेल.. ज्या विद्यार्थ्याने रोज अभ्यास केला त्याला.. दुसरा विद्यार्थी पास होईल कि नापास होईल यांची शाश्वती नाही म्हणजेच यश मिळेल याची खात्री नाही म्हणजेच यश हे नेहमी त्यालाच मिळते जो स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट करतो त्यालाच.. हाच नियम आपणस जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू पडतो.. जेव्हा आपले कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करू त्यात कष्ट करताना आपण कोणतीही कमतरता ठेवत नाही तेव्हा आपणस शाश्वत यश मिळतेच.. म्हणून स्वामी भक्तहो न थकता.. न थांबता अखंड कर्म रुपी सेवा सुरु ठेवूया .. धन्यवाद समर्था ..बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय