स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)*
*प्रेरणादायी बोल*
एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ कर्म कर..उगाचच हा विचार करू नकोस की लोक काय म्हणतील..आपल्या सर्वांच्या मनात हा विचार घर करून बसलेला असतो की..मी हे कर्म केले तर लोक काय म्हणतील..अहो लोक काय म्हणतील या पेक्षा तुला काय वाटते..आपल्या स्वामीं ना काय वाटते हे महत्वाचे… अनेकदा एखादा कार्यक्रम असतो..लोक नाचत असतात..आपल्या मनात असते मी ही नाचावे..पण मनात विचार येतो..मी नाचलो तर लोक काय म्हणतील…अरे तुला आनंद मिळत आहे ना..तुझ्या आनंदाने कुणाचे नुकसान तर होणार नाही..स्वामीं ना तर कर्म आवडणारे असेल तर मग का विचार करतोस लोक काय म्हणतील.. लोक काय विचार करतील या विचाराने अनेक लोक आपले मन सुद्धा मोकळे करत नाहीत.. त्याचा परिणाम नको तिथे राग निघणे, कामात चुकी होणे असा होतो…अनेकदा आपण आपल्या मुलांनाही सांगतो.. अरे असे करू नकोस लोक काय म्हणतील? अहो या पेक्षा मुलांना सांगा तुला काय करावे वाटते हे मनसोक्तपणे बोल..त्याला बोलू द्या…त्यावर आधी चिंतन मनंन करा..जर अयोग्य असेल तर का अयोग्य आहे ते सांगा..पण कारण वास्तविक असावे..जर आपल्या मुलांचे म्हणणे बरोबर असेल.. तर लोक काय म्हणतील या पेक्षा ..ही गोष्ट याला करू न दिल्यामुळे त्याचे किती नुकसान होईल हा विचार करा..फक्त एकच गोष्ट करा..स्वामीं ना भूषणावह कर्म करा..पहा कसे आनंदी जीवन होतें..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!