स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)*
*प्रेरणादायी बोल*
हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन स्वामीं काळजी घेण्यास सांगत आहेत..काळजी पण काळजी म्हणजे चिंता नव्हे तर आपण जे काही कर्म करतो..ते कर्म करताना काळजी घेण्यास स्वामीं सांगत आहेत..आपण जे काही कर्म करत आहोंत ते चुकीचे कर्म तर करत नाही ना..म्हणजे आपण जे काही कर्म करत आहोत त्यामुळे देश, समाज, वन्य जीव प्राणी यांचे आपण नुकसान तर करत नाही ना..जर आपण नुकसान करत असू व आपणस वाटत असेल की मला कुठे कोण पहात आहे.. स्वामीं पहात आहेत…! पहा रस्त्यावर कचरा टाकु नका, थुंकू नका हे आपण लहानपणा पासून ऐकतो, बोलतो..अनेक ठिकाणी बोर्ड सुद्धा असतो की असे करू नका नाही तर दंड होईल.. आपण मात्र नजर चुकवून या गोष्टी करतो..आपणस आनंद होतो की मला कुठे कुणी पाहिले..पण आपण हे विसरतो की हे स्वामीं।पहात आहेत..आपण अशी चूक करून आपण स्वतः ला तर फसवतोच त्याच बरोबर आपल्या पुढच्या पिढीचे सुद्धा नुकसान करत आहोत..ते कसे पहा आपण लहानपणी दुधा शिवाय कशालाच प्लास्टिक पिशवी वापरत नव्हतो..आपले काही अडत होते का?? आज आपण प्लास्टिक पिशवी वापरतो..त्याचा परिणाम रस्त्याच्या कडेने प्लास्टिक मध्ये कचरा..हे कर्म कुणी केले आपण..याची फळे आपण तर भोगत आहोतच पण भावी पिढी सुद्धा यांचा दुष्परिणाम भोगणार आहे..पहा…पहा ही चूक आपण करतो व म्हणतो आम्ही नाही इतर लोक..म्हणून प्रत्येक कर्म करताना स्वामीं ना भूषणावह कर्म करावे..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय