स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७)
अमृत वचन
हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो… आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…आपणस अनेक प्रश्न असतात..अडचणी असतात त्याची उत्तरे आपणस मिळत नाहीत..मग आपण ते प्रश्न इतरांना विचारतो.. उदाहरणार्थ मला आर्थिक समस्या आहे..मग मी काय करतो..अनेक लोकांना विचारतो की माझी समस्या कशी सुटेल..मग समोरची व्यक्ती काही तरी सांगते ते आपण करतो..कधी यश येते.. कधी अपयश येते..पुन्हा आपण आपला प्रश्न घेऊन अजून कुणाकडे जातो…तो आणखी काहीतरी सांगतो..परत आपला प्रवास सुरु होतो..पण आपण कधीच स्वतः ला त्या प्रश्नांची उत्तरे विचारत नाही..कारण आपणस स्वतःला प्रश्न विचार असे कधी कुणी सांगत नाही..आज स्वामीं आपणास सांगत आहेत..हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! ह्रदयाचा आवाज म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेऊ…विचार हा एक असतो पण.. जे सतत येत जात असतात ते विचार..दुसरे विचार असतात जे आपण शांत असताना येतात त्याला आपण हृदयाचा आवाज म्हणतो.. ..जेव्हा आपण आपल्या आता डोकावतो..कोणताही निर्णय घेताना शांत होतो..सर्व विचार सोडून आपले मन आपल्या ह्रदयावर केंद्रित करतो..मन भटकंती करते..पुन्हा आपण त्याला ह्रदयावर आणतो..याला म्हणतात ह्रदयावर जाणे..हा एक अभ्यास आहे..जो प्रत्येकाने केला पाहीजे…या साठी रोज थोडा वेळ बसा.. सुरवातीला कंटाळा येईल..नंतर आवड निर्माण होईल..आपल्या मनात प्रश्न आहे..तो प्रश्न स्वामीं ना सांगा..स्वामीं आपण तर सर्व जाणताच कृपा करा मला ह्रदयातून मार्गदर्शन करा..प्रार्थना झाली की..डोळे झाका..स्वामीं समोर बसा..मनात विचार येतील..येऊ द्या..विचार आले तसे जातील..आपणस मनाला आपल्या ह्रदय स्थानावर आणायचं आहे..सुरवातीला ५ मिनिट प्रयत्न करा..नंतर ही वेळ १० , २० मिनिट करा..पहा काय काय उत्तरे आपणस मिळतात..आता यात महत्वाचे..आपणस मिळालेले उत्तर आहे की आपले नेहमीचे विचार आहेत हे तपासून पहा..जसे आर्थिक समस्या आहे..आणि आपल्याला उत्तर मिळत आहे..व्यवसाय कर ..पण हा विचार खरंच आपल्या हृदयातून येत आहे कि इतर करतात म्हणून मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे हे तपासून पहा.. जे काही विचार येत आहेत ते लिहून काढा.. त्यावर चिंतन मनन करा.. अश्या विचारांवर काम करायचे नाही..ज्या वर आपण अभ्यास केलेला नसेल.. आपणस सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे..कारण ह्रदयातून मिळणारे मार्गदर्शन हे..आपणस तर सुख..आनंद देतेच पण त्याच बरोबर ते समाज हितकारी असते.. रोज थोडा वेळ तरी आपल्या हृदय स्थानावर जा.. पहा नक्कीच स्वामीना अपेक्षित असणारी अभिव्यक्ती होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय