स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)*
*आजचे चिंतन-मनन*
स्वामी स्वामी जप करता,
स्वामी भेटे भोळ्या भक्ता !
ऐसा माझा देव भोळा,
मात्र नाम घेता,घेतो धावा !!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून घ्या..स्वामी स्वामी जप करता..इथे स्वामीं नाम घेण्याचा बोध होतो..आता यात ही आपले मन म्हणते किंवा कुणी तरी सांगते असाच जप करा..हाच जप करा..कुणी स्वामीं..स्वामीं जप करेल..कुणी ओम स्वामी ओम म्हणेल..कुणी ओम श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी गुरुदेव म्हणेल..कुणी श्री गुरुदेव दत्त म्हणेल..जप कोणता करतो यापेक्षा..मुखात नाम येते हे खूप मोठी स्वामीं कृपाच आहे…आता स्वामी नाम तर घेतो..पण मग कुणी म्हणतो असेच घ्या..ही माळ वापरा, इथेच जप करा, अमुक इतकाच जप करा..असे केले तर असे होते..म्हणजेच सेवा बाजूला राहते आपण..नको त्या तांत्रिक, यांत्रिक, शुभ , अशुभ, चूक बरोबर यातच अडकतो..म्हणजेच त्या परब्रह्म चे नाव घेतानाही अनेक आपण आपल्या बुद्धी चे तर्क वितर्क लावतो..खरंतर स्वामीं ना भोळा भक्त आवडतो..काहीच करत नाही पण आपला अहंकार, स्वामीं चरणी अर्पण करतो..त्याला फक्त स्वामीं नाम दिसते.. स्वामीं भक्ती दिसते..बाकी काहीच त्याला समजत नाही..बाकी कोणत्या गोष्टी त तो अडकत नाही.. स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म म्हणजे स्वामीं सेवा असे ज्याला वाटते तो स्वामीं चा प्रिय भक्त असतो..कारण आपले स्वामीं ही भोळे आहेत..पहा अंगावर वस्त्र आहे का ? फक्त लंगोट आहे..स्वामीं ना आपल्या कडून काहीच नको आहे..हवी आहे ..प्रामाणिक स्वामीं सेवा, प्रामाणिक कर्म..म्हणजेच आपण जे काम करतो त्यात सुद्धा स्वामींना प्रामाणिकपणा हवा आहे..पहा जर हा गुण आपण आपल्यात धारण करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच स्वामीं कृपेचा वर्षाव होतो..फक्त गरज आपल्यात भोळा भक्ती भाव निर्माण होण्याची..इथे एक गोष्ट कदाचित आपल्या मनात येईल..भोळा भक्ती भाव म्हणजे अंधश्रद्धा.. असे नसून आपणस डोळस स्वामीं भक्ती करायची आहे…म्हणजेच आपणस आपले कर्म १०० % स्वामीं सेवेचा भाव ठेवून करायचे आहे ..कर्म करत असताना आपणस कुणी फसवत नाही ना याचेही भान आवश्यक आहे..कारण स्वामीं ना अंधश्रद्धा बाळगणारे सेवेकरी नाही आवडत..कर्मावर प्रामाणिक श्रद्धा असणारा भक्त आवडतो..आपणस स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे..धन्यवाद स्वामीं..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!