स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*
*आजचे चिंतन-मनन*
परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in
स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!