परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

Feb 6, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*

*आजचे चिंतन-मनन*

परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in

स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...