नामाचा नको कंटाळा !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५)

आजचे चिंतन-मनन

नामाचा नको कंटाळा !
स्वामींचा असावा जिव्हाळा !!
प्रेमभावे नित्य आळवावा !
स्वामी माझा !!
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ, चर्चा वा इतर गोष्टीचा पण स्वामीं नाम घ्यावे म्हंटलं की झोप येते, कंटाळा येतो..मग आपण स्वामीं नाम घेत नाही..खरंतर दिवसभरात किमान १ तास आपण सोशल मीडियावर असतो..हा १ तास आपण स्वामीं नाम सेवे साठी देऊ शकतो..पण आपला जिव्हाळा आहे..भौतिक वस्तू मध्ये..स्वामीं नामा वर जिव्हाळा निर्माण होण्यासाठी प्रथम आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..आपल्या मनाला घेऊन आपणस रोज १ माळ, 3 माळ ११ माळ, २१ माळ जप सेवा करावी लागेल..तेव्हा हळूहळू स्वामीं नामात आपणस प्रेम, जिव्हाळा निर्माण होईल..एकदा स्वामीं नामात प्रेम निर्माण झाले की..आपले जीवन म्हणजे..आनंददायी असणार यात काहीच शंका नाही…जर चिर आनंद हवा असेल तर स्वामीं नाम घ्या..आपला प्रत्येक श्वास हा स्वामीमय बनला पाहिजे..स्वामीं नाम सेवेला पर्याय नाही..आणि जेव्हा आपल्याला स्वामीं नाम।महिमा समजेल तेव्हा.. ह्रदयातून स्वामीं नामाचे प्रेम अश्रू येतील..स्वामीं आपल्याला मिठीत घेण्यास तयार आहेत..पण आपण इतरत्र भटकत आहोत..अमुक गोष्ट केली तर स्वामीं खुष होतील..आणि माझे अमुक अमुक काम होईल..अहो आपले काम तर होणारच आहे..पण स्वामीं त्या पेक्षा मोठी गोष्ट आपणस देऊ करत आहेत..आपण फक्त प्रेम भावनेने स्वामीं नाम घेणे आवश्यक आहे..आपणस विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..बाकी कोणती सेवा करण्याची गरजच भासणार नाही..फ़क्त स्वामीं नामला मिठी मारा..जर स्वामीं नी मिठीत घेतले नाही तर सांगा..स्वामी माझा कधीच निराश करत नाही..फक्त गरज आहे स्वामीं नाम सेवेची..धन्यवाद स्वामीं..!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...