तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१)

आजचे चिंतन-मनन

तुज चरणापासून नको दूर लोटू !
तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!
दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !!
दास राहीन सदैव !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो…भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द…खरच समर्था खूप खूप धन्यवाद असे भाव, विचार वाणी आमच्या पर्यंत पोहचवतोस त्याबद्दल.. हीच तर तुझी कृपा आहे..समर्था काहीही होऊ दे पण आम्हाला तुझ्या चरणापासून दूर करू नकोस..इथे आपली गल्लत होऊ शकते स्वामीं चरण फक्त स्वामीं च्या मंदिरात आहेत का ? नाही तर सर्वत्र स्वामीं चरण आहेत..प्रत्येकाच्या हृदयात स्वामीं चा वास आहे..पण आपणस याचा विसर पडला आहे.. आपण इतरत्र स्वामीं ना शोधतो…आता ती वेळ आली आहे..स्वामींना प्रार्थना करूया समर्था तुझे जे स्थान ..चरण..हृदयात आहेत..त्या पासून मला दूर करू नकोस…आता आपणस स्वामीं च्या चरणांशी स्थान मिळाले..पण ते टिकवता आले पाहिजे..त्याला पर्याय काय.. स्वामीं नाम “”श्री स्वामीं समर्थ”” नामाचा जप..पण आपण सोपे साधन सोडून नको त्या मार्गाने स्वामींना शोधतो..म्हणून आज पुन्हा सर्वांना विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..थोडे घ्या पण..माझे स्वामीं आईचे नाम घ्या..स्वामीं नामाची सवय कशी लागू शकते..दृढ संकल्पाने..जसे मी सामूहिक ११ कोटी स्वामीं नाम जप सेवेत एक वर्षात किमान ६,६६,६६६ स्वामीं नाम सेवा रुजू करेल..कुणी म्हणेल मी २१,००० सेवा रुजू करेल..हा झाला दृढ संकल्प… सामूहिक स्वामी नाम सेवा हे निमित्त आहे स्वामीं सेवेचे..पहा आजरी पडल्यावर आपण औषध घेतो.. पण आजारी पडू नये याचीच काळजी आपण घेतली तर..आपले मन आजारी पडते..मग आम्ही हताश होतो.. इकडे तिकडे भरकटत बसतो .जर आपण आजपासून मनाला स्वामीं नाम सेवेचे काम दिले तर..नक्कीच ते भरकटणार नाही..ते इतरांना देखील प्रेरणा देईल..इथे म्हंटले आहे..दास राहीन..इथे थोडक्यात आपणस आपल्या मनाचे दास न बनता.. आपल्या मनाला स्वामी चरणाचे.. स्वामीं नामाचे दास बनवायचे आहे..म्हणजेच आपल्या हृदयातील स्वामीं चरणी आपणस एकरूप व्हायचे आहे..यावर आपण स्वतः चिंतन मनन करा..खूप छान मार्गदर्शन स्वामीं करतील..स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं ही समज दिल्याबद्दल.. हे चिंतन करून घेतल्याबद्दल…!


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...