स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८)
आजचे चिंतन-मनन
हे मना !
आता नको भीती कुणाची !
प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!
क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची !
ही गुरूमाऊली !!
www.SwamiVaani.com
या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या अंतर्मनात असते..जिचे रूपांतरण आपल्या जीवनात होत असते..जसे आपल्या मनात भीती किंवा वैचारिक काहूर असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो..मग अनके शारीरिक त्रास सुरू होतात..या साठी स्वामीं आपणस मनावर कार्य करण्यास सांगत आहेत..मनावर कार्य करण्याचा सोपा मंत्र..तारक मंत्र म्हणा..पहा आपल्यात विचारात, मनात किती बदल होतो..आपल्या पाठीशी स्वामीं ची शक्ती आहे पण आपण हे विसरलो आहोत.. यांचा विसर पडला की भीती , भय निर्माण होणारच.. ही भीती आपणस दूर करायची आहे..आपण जर सूक्ष्म विचार केला तर आपणस जाणवेल स्वामीं आपली कशी काळजी घेतात.. या साठी आपणस भक्ती भाव वाढवणे आवश्यक आहे..भक्ती भाव कसा वाढेल..रोज नाम जप सेवा..तारक मंत्र म्हणणे हाच तर उपाय आहे..चला तर मग स्वामीं नाम घेऊया…!