अशक्य ही शक्य करतील स्वामी

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०)

आजचे चिंतन-मनन

अशक्य ही शक्य करतील स्वामी
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा |

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार आहे..स्वामीं भक्त आणि तारक मंत्र.. हे स्वामीं आणि स्वामीं भक्ताच्या नात्याला घट्ट करणारा दोर म्हणा साखळी म्हणा..काय ते भाव आहेत.. मनाला टॉनिक..बुडत्याला आधार..तारक मंत्र म्हणजे..जो स्वामीं भक्ताला तारतो.. भक्ती भाव ह्रदयात उत्पन्न करतो..या विषयी किती ही लिहिले तरी शब्द भांडार कमी पडेल..असो..आपण रोज तारक मंत्र सेवा करत असालच..करत नसाल तर सुरू करा..जगी.. म्हणजे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण सृष्टीत..प्रत्येक जीवाच्या जन्म आणि मृत्यू ही स्वामीं ची लीला आहे..आणि अश्या या ब्रम्हांड नायकाचे आपण बालक आहोत..इथे बालक म्हणजे आपण त्यांचे बाळ आहोत..पहा आपण आपल्या बाळाची कशी काळजी घेतो..हातावरच्या फोडा पेक्षा अधिक..आपण आपल्या बाळाची काळजी घेतो..मग विचार करा आपण स्वामीं आईचे बाळ आहोत..स्वामीं आपली किती काळजी घेतात…हा अनुभव आहे..जो सूक्ष्म असतो..जो अनुभवता आला पाहिजे..कारण आपले मन चांगले झाले की कधी म्हणते का? स्वामीं मुळे झाले ? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधू तेव्हा आपणस याचा अनुभव येतो..आपल्याला मनाला सांगता आले पाहिजे..घाबरू नकोस तू स्वामीं चा बाळ आहेस..हा पण इथे ही गोष्ट लक्षात असावी आपले कर्म स्वामीं ना भूषणावह असावे…एखादी गोष्ट आपणस अशक्य वाटत असेल तर..मनाला सांगा अशक्य असे काहीच नाही..कारण अशक्य हा शब्दच मुळात स्वामीं भक्ताला लागू होत नाही..मी फक्त १००% प्रयत्न करणार..आणि जो पर्यंत यश मिळत नाही..तो पर्यंत थांबणार नाही..कारण.. प्रत्येक वेळेस स्वामीं सांगतात की तू या पेक्षा चांगले करू शकतोस.. थांबू नकोस..पहा..सर्व काही शक्य होताना आपणस दिसेल.. धन्यवाद समर्था..! चला स्वामीं ना प्रार्थना करूया..हे समर्था..मी जाणतो की संपूर्ण ब्रम्हांड चा तूच तर चालक आहे..पण माझे मन।हे विसरते.. हे विसरल्या मुळे.. घाबरते..या मनाचा हा विसराळू पणा कायमचा दूर कर..अशक्य हा शब्द आमच्या मनातून..विचारातून काढून टाक.. कारण मी तुझे बालक आहे..आणि तू कधीच आम्हाला भरकटू देत नाहीस..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...