सज्जन कुणाला म्हणावे ?

Feb 4, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२)

आजचे चिंतन-मनन

सज्जनांचे सज्जनत्व वाढव !
दुर्जनांचे दुर्जनत्व घालव !
अवघे विश्व स्वामीमय होवो !
हेचि मागणे समर्था !!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो कि आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि सज्जन नेमके कुणास म्हणायचे.. आपल्या मनात एक व्याख्या असते आणि व्यक्ती नुसार ती बदलत असते.. पण मग सज्जन कुणास म्हणावे.. स्वामी तुम्हींच यावर चिंतन मनन करून घ्या.. प्रत्येक व्यक्ती हि सज्जनच असते.. कारण प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले बनायची लालसा असते.. अशी एक व्यक्ती नाही कि तिला दुर्जन बनून आनंद होतो पण तो वेळेनुसार आपल्यात बदल करतो आणि स्वतःला दुर्जनांच्या यादीत बसवतो..आपण सज्जनांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया ” जो कोणत्याही परिस्थितीत स्वामींना भूषणावह असेच आचरण करतो तोच सज्जन” पहा आपला काही तरी व्यक्तिगत फायदा होत आहे पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते आहे तरीही आपण आपल्या फायदा व्हावा या साठी चुकीचे वर्तन करतो तेव्हा आपण सज्जनांच्या भूमिकेतून दुर्जनांच्या भूमिकेत जातो .. आता आपल्या सर्वांच्या मनात येते कि जर आपण वेळेनुसार आम्हीं तसे वागलो नाही तर आमचे कोणतेच काम होऊ शकत नाही मग आम्ही काय करायचे.. पहा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हाही संयम बाळगतो थोडे थांबतो आणि मग निर्णय घेतो नक्कीच स्वामींना भूषणावह निर्णय घेत असतो.. जेव्हा आपल्या मनात संभ्रम असेल तेव्हा थोडे शांत व्हा स्वामींना प्रार्थना करा मार्गदर्शन करा.. पहा आपला निर्णय हा स्वामींना भूषणावह म्हणजे सज्जन माणसाचा असेलसुरवातीला अवघड वाटेल पण नंतर आपणस यात यश.. जेव्हा प्रत्येक जण असा प्रयत्न करेल तेव्हा सर्व दुर्जनांचे दुर्जनत्व दूर होणार आहे.. आपल्या मनात येते मी एकटा चांगला वागून काय फायदा.. पहा पत्त्याचा बंगला असतो.. त्यातील एक पत्ता काढला तर बंगला पडतो तसेच आपण आपल्यातील दुर्गुण काढला तर इतर लोक हि आपल्यातील दुर्गुण काढतील..सज्जन होतील.. आणि संपूर्ण विश्व् हे स्वामी मय होईल.. पहा किती सुंदर नियोजन आहे आपल्या स्वामींचे फक्त गरज आहे आपल्यातील दुर्गुण काढून चांगले गुण धारण करण्याची म्हणजेच आपल्यात स्वामींना भूषणावह असणारे सज्जनांचे गुण आपल्यात धारण करण्याचा.. चला तर मग आपल्या स्वतःवर कार्य करूया.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...