देहभान हरपणे म्हणजे काय ?

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)*

*आजचे चिंतन-मनन*

देहाचें भान न उरो !
गळून जाऊ दे अहंपणा !
कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !!

www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे…देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण एखादे काम करत असू तर आपणस त्या कामात यश नक्की प्राप्त होते..हा नियम आध्यत्मिक बाबतीत ही लागू होतो..पण इथे एक गल्लत आपली होऊ शकते…अन्न पाण्याचा त्याग करणे..असा अर्थ नसून.. स्वामीं नाम घेताना आपणस इतर गोष्टीचा त्याग करता यावा..जसे स्वामीं नाम घेताना आपणस झोप येते..कंटाळा येतो..या गोष्टींवर आपणस मात करण्याची समज स्वामीं आपणस देत आहेत.. पहा आपणस स्वामीं नाम घेताना झोप येते किंवा कंटाळा येतो..मग हे असे का होते यावर आपणस कार्य करायचे आहे..पहा जेव्हा आपण यावर काम करू तेव्हा आपला देह स्वामीं नाम सेवेस तयार होणार आहे..म्हणजेच आपल्या देहाचे भान हरपेल.. यासाठी मनाला आणि शरीराला स्वामीं नाम सेवेस बसवा..मन नको म्हणेल..ते का नको म्हणता आहे..त्याचा अभ्यास करा..आपल्यातील ते दोष दूर करा..नक्कीच आपणस यश येईल..गळून जाऊ दे अहंपणा ! अध्यात्म असो वा व्यक्तीगत जीवन यात मोठा अडसर कोणता असेल तर..तो आहे..अहंपणा..पहा मी इतकी सेवा करतो..सेवा कोण करतो मी..मी इतके देवाचे करतो…म्हणजेच अहंपणा..अहो त्याच्या इच्छे शिवाय आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही..स्वामीं सेवा किंवा इतर गोष्टी काय करणार..इथं असा गैरसमज करून घेऊ नका मी काहीच कर्म करणार नाही..असे नाही सर्व काही करा पण आपल्यातील अहंपणा सोडा..कर्म करून विसरून जा..म्हणजेच स्वामीं सेवा केली असे म्हणण्या ऐवजी म्हणा…” स्वामीं नी सेवा करून घेतली” पहा कसा हळूहळू अहंभाव गळून पडेल..कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !! पहा जर आपले चित्त शुद्ध नसेल तर आपणस अडचणी येतात..पहा दोन भांडी आहेत..दोन्ही स्वच्छ दिसतात..एक भांडे असे आहे त्यात नकळत थोडा भांडे घासण्याचा साबण राहिला आहे..पहा काय परिणाम होईल..जर आपल्या दिसले तर आपण ते स्वच्छ करू..जर ते स्वच्छ नाही केले तर त्यातील दूध खराब होईल..त्याच प्रमाणे आपण जर आपले चित्त शुद्धी केली नाही तर…आपण कोणतेच कार्य व्यवस्थित करू शकता नाही..म्हणून रोज प्रत्येक क्षणी चित्त शुद्धी वर लक्ष ठेवा..आपले चित्त स्वामीं चरणी लीन व्हावे यासाठी प्रार्थना करा..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नक्कीच यश देतील..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...