स्वामीं नाम आणि आपले जीवन

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)*

*आजचे चिंतन-मनन*

नाम घ्यावे,नाम द्यावे !
नाम सांगावे, नाम ऐकावे !
नाम पुजावे,नाम भजावे !
अवघे जीवन करावे नाममय !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात सातत्य ठेवतो..तेव्हा नामाचा महिमा अनुभवास येतो..जर आपणस नामाची अनुभूती हवी असेल तर नाम घ्या..कोणतेही नाम घ्या…असे नाही की अमुकच नाम घ्यावे..कोणतेही नाम घ्यावे..नामावर मनाल स्थिर करा…नाम द्यावे..इथे आपणस वाटते की इतरांना नाम दयाचे आहे..असे नाही तर आपल्या मनाला, विचारांना खाद्य द्यावे कशाचे तर नामाचे.. रोज जेवतो..तसे मनाला ही खाद्य हवे आहे कोणते..नामाचे..मनाला नाम रुपी सेवेचे खाद्य द्या..नाम सांगावे.. इथे आपणस वाटते की इतरांना नाम घेण्यास सांगायचे आहे..असे नाहीये..आपल्या मनाला सांगा आता बाकी काही आवश्यकता नाही..स्वामीं नामच सर्व काही आहे..आता किती दिवस ही सेवा करू की ती करू..नको नको आता फक्त मनाला एकच ध्यास लागावा..यासाठी स्वामीं नाम घ्यावे..नाम ऐकावे..काय ऐकावे हे सुद्धा आपणस इथे स्वामीं समज देत आहेत.. स्वामीं नाम ऐका.. स्वामीं चरित्र ऐका.. स्वामीं महिमा ऐका.. आपण दिवसाची सुरुवात कशाने करतो..सकाळी उठले की काय ऐकतो..सकारात्मक विचार ऐकणे हे सुद्धा स्वामीं नामच..म्हणजेच असे ऐका ज्याने आपली चेतना उंचावेल..बाकी काही नाही ऐकता आले तर..स्वतः स्वामी नाम घ्या आपल्याला ऐकू येईल त्या आवाजात..तेच श्रवण करा…नाम पुजावे.. इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो..नामाची पुजा करायची म्हणजे काय..आता एक उदाहरण पहा आपण काय जपतो, कशाची पुजा करतो..दिवस रात्र आपण कष्ट करतो..पैसे कमवण्यासाठी..म्हणजेच एक प्रकारे पूजा करतो..पैसे आवश्यक आहेतच..आता मग स्वामी नामाची पुजा कशी करावी..ज्याप्रमाणे आपण नेहमी पैसे कमी होऊ नये या साठी प्रयत्न करतो..त्याचप्रमाणे ” स्वामी नामाची पुजा करा” स्वामी नामाचा विसर होणार नाही, जसा पैसे महत्वाचे तसे आपल्या जीवनात नामाला महत्व द्या..जसा पैसे वाढतात तसे आपल्या जीवनात नामाचे महत्त्व वाढावे..ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातून कमी करू शकत नाही..नाम असे जपा की शेवटचा श्वास हा स्वामी नामाचाच असेल..या साठी रोज स्वामीं नाम घ्या..नाम भजावे.. नाम भजावे म्हणजे आपल्या मुखाने स्वामीं नाम घ्या..बाकी वायफळ बडवड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या जिभेला स्वामीं नामाची गोडी द्या..पहा जेव्हा जिभेला ही सवय लागेल तेव्हा प्रत्येक परिस्थितीत स्वामीं नामच येईल..आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामीं नाममय बनवू..इथे आपल्या मनात येते असे कसे.. अहो जेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण होईल स्वामीं नाम सेवा ( इतर कोणतेही नाम) ही सेवा स्वयंपूर्ण सेवा आहे..आता बाकी कोणती सेवेची आवश्यकता नाही..हे जेव्हा आपल्या अंतर्मनात कोरले जाईल…स्वामीं नामच आपल्या।मुखातून येईल..स्वामीं भजन होईल..प्रत्येक कर्म स्वामीं सेवा वाटेल तेव्हाच आपले जीवन स्वामीं मय होणार आहे..या साठी आपणस रोज स्वामीं नाम सेवा करायची आहे..स्वामीं ना प्रार्थना करायची आहे..नक्कीच स्वामीं कृपा होत आहे..आपले जीवन स्वामीं मय होत आहे..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...