स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

Jan 30, 2023 | Uncategorized

Share

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड आहे..आपणस वाटते की स्वामीं नाम जप केला व स्वामींचे स्तोत्र वाचले की झाली सेवा..काहींना वाटते की अजूनही काही इतर देव..देवतांचे स्तोत्र म्हंटलं नाही तर स्वामीं सेवा पूर्ण होत नाही..मग आपण यात आणखी सेवा ऍड करतो..पहा प्रत्येक सेवा ही परिपूर्णच आहे..असे नाही की अमुक मंत्राचा जप केला तरच ती स्वामीं सेवा..म्हणजेच कोणतीही सेवा करा पण ह्रदयातून करा..फक्त स्वामीं नाम घेतले तरी ती स्वामीं ची परिपूर्ण सेवा आहे..पण आपले मन नेहमी सगळी खिचडी करते..ही सेवा केली तर असे होईल..नाही केली तर असे होईल..पहिला हा  चुकीचा विचार मनातून काढून टाका.. आपण कोणतीही सेवा करा पण मनापासून करा..तुम्ही स्वामीं म्हणा, राम म्हणा किंवा श्री स्वामीं समर्थ म्हणा..प्रत्येक हाकेला स्वामीं ओ देतातच.. फक्त ती हाक ह्रदयातून हवी..आता हे झाले सेवेचे.. पण ही सेवा अपूर्ण आहे..जर आपण कर्म आणि सेवा यात भेद करत असू तर..कारण स्वामीं नी आपणस जे प्रापंचिक काम दिले आहे..ते जर आपण फक्त काम म्हणून पहात असू तर आपण स्वामीं सेवा ह्रदयातून करत नाही.. म्हणजेच आपणस जे काम मिळाले आहे ती सुद्धा स्वामीं सेवा आहे..ते काम करताना आपले भाव जर नकारात्मक असतील तर..आपली स्वामीं सेवा ही कायम अपूर्ण असते.. आपल्यावर स्वामीं कृपा होऊच शकत नाही.. म्हणून नेहमी आपण जे काही काम करता त्यात स्वामीं सेवेचा भाव ठेवा..आपण गृहिणी आहात.. तर आपले कर्तव्य आहे की घरातील काम हे स्वामी सेवा म्हणून करा..पहा आनंद मिळेल.. नाहीतर आपणस कायम वाटत राहील मला सुट्टी च नसते..अहो स्वामीं सेवेकरी तोच जो म्हणतो..धन्यवाद स्वामीं मला सेवेची संधी दिली…हेच आपण जी काही नोकरी करतो काम करतो याला सुद्धा लागू होते.. जर आपण काम चुकार पणा करत असू..आपले आचरण हे भ्रष्टाचार करणारे असेल तर..आपण कितीही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ती स्वामीं सेवा कधीच असू शकत नाही..पण आपले आचरण शुद्ध असेल आपण आपल्या प्रत्येक कर्मास स्वामी सेवा मानत असाल तर नक्कीच आपलीं स्वामीं सेवा ही नित्यसेवा आहे..स्वामीं कृपेचा वर्षाव आपल्यावर होत आहे..खरंतर हा आपण स्वतः चिंतन मनन करण्याचा विषय आहे..यावर आपण अधिक चिंतन मनन करा..अजूनही काही प्रश्न असतील विचारा..नक्कीच आपण त्यावर चिंतन मनन करूया..स्वामीं ना अपेक्षित अशी स्वामीं सेवा करूया..स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म करूया..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...