मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

Nov 20, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6
श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते… गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक विहीर होती तिथे कणसे भाजण्याची तयारी करण्यात आली.. तिथेच एक कल्पवृक्ष होते त्या खाली महाराज बसले .. त्या झाडाला मधमाश्याचे पोळे होते.. हे कुणाच्याही लक्षात आले नाही.. तिथेच कणसे भाजण्यासाठी सुरवात केली.. कणसे भाजत असताना धूर व अग्नीची दाहकता याचा परिणाम असा झाला कि त्या झाडावरील मधमाश्या उठल्या व सर्वांना चावू लागल्या.. सर्व जण पळू लागले श्री महाराज मात्र जागेवरून उठले नाही..ते स्वस्वरूपात रममाण होते.. सर्व माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या.. जसे कि महाराजांनी माश्यांची शाल केली आहे.. हे सर्व पाहून श्री बंकटलाल यांचे हृद्य द्रवित झाले.. त्यांच्या मनात विचार आला कि उगाचच आपण श्री महाराजांना कणसे खाण्यासाठी इथे आणले.. आणि श्री बंकटलाल श्री महाराजांकडे जाऊ लागला.. त्या क्षणी श्री महाराजांनी त्या मध माशांना आपल्या जागी जाण्याची आज्ञा दिली.. ते म्हणाले अरे माझा खरा भक्त माझ्या साठी येत आहे.. त्याला त्रास देऊ नका तुम्ही आपल्या जागेवर जा.. महाराजांनी असे म्हणताच सर्व माश्या झाडावर जाऊन बसल्या.. श्री बंकटलाल यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.. ते महाराजांना म्हणाले.. मी सोनाराला घेऊन येतो काटे काढण्यासाठी.. बंकटलाल सोनाराला घेऊन येतात.. सोनार पहातो तर त्याला एकही काटा दिसत नाही… तेव्हा तेव्हा सोनार म्हणतो कि मला तर काटे दिसत नाहीत.. तेव्हा श्री महाराज म्हणाले काटे काढण्यासाठी चिमट्याची आवश्यकता नाही.. महाराजांनी काही क्षण श्वास रोखला व काही क्षणात सर्व काटे बाहेर आले.. महाराजांचे शरीर पूर्वी प्रमाणे झाले.. हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीला म्हणजे भक्ती कशी असावी हे सांगण्यासाठीच हि लीला आहे.. पहा ब्रम्हांड नायक कणीस खाण्यासाठी शेतात गेले.. खरे तर हे एक निमित्त होते परीक्षा पाहण्यासाठी..मधमाशी मध देते पण ते अदृश्य रूपाने देते.. कारण आपण मध तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा तिथे माशी नसेल.. म्हणजेच गुरुकृपा तेव्हाच होते जेव्हा संकट रुपी माशी दूर करू.. संकट रुपी माशी असतानाही जेव्हा आपण अखंड सेवा सुरु ठेवतो.. तेव्हा त्या सेवेचे फलित म्हणजे मधाप्रमाणे गोडवा होय.. जेव्हा आपण संकटाशी दोन हात करतो.. संकटात देखील आपली श्रद्धा ढळत नाही तेव्हा त्याचे फलस्वरूप गोडच असते.. वरील लीलेत कणसे खाण्यासाठी सर्व आली पण मध माश्या आल्यावर सर्वजण पळून गेली.. श्री बंकटलाल मात्र त्याही स्थिती मध्ये श्री महाराजांकडे जाण्यासाठी तयार होते.. त्याचे फलस्वरूप श्री महाराजांनी माश्याना आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा दिली.. श्री बंकटलाल यांची भक्ती फारच उच्चतम होती.. यातून हाही बोध आपणस मिळतो कि एखादा संकटात असेल तर त्याला मदत करा कारण आज आपण त्याला केलेली मदत हि देखील सेवेचा एक भाग आहे.. इथे कदाचित आपल्यात मनात येइल कि आर्थिक मदत का ? आर्थिक मदत असे नाही तर आपण इथे मानसिक मदत करू शकतो.. आत्म बळ वाढवू शकतो.. मदत हि अनेक प्रकारे होऊ शकते फक्त मदत करताना आपले तसेच समाजाचे तसेच ज्याला आपण मदत करत आहोत त्याचे नुकसान तर होत नाही ना याची देखील आपणस भान ठेवायचे आहे.. चला तर मग आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया –हे समर्था.. आजची तुझी लीला म्हणजे भक्तीचा पाठच म्हणावी लागेल.. आजच्या लीलेतून संकटकाळी सुद्धा कशी भक्ती करावी याची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद…जसे भक्ती भाव बंकटलाल यांच्या हृदयात प्रगट झाले.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव.. हे मध माश्यानो आज पर्यंत आम्हीं आपणस फक्त आपण चावता एवढेच लक्षात ठेवल.. पण मधाची मधुरता तुमच्या शिवाय शक्य नाही हि शिकवण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. कोणतेही संकट येवो.. आपल्यातील मधुरता आम्हाला आठवावी हीच समर्था प्रार्थना

 


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...