१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

Oct 16, 2022 | चरित्र, मराठी

Share

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना वंदन करत आहेत.. ते म्हणत आहेत प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करताना जो आनंद होत तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.. यात मला जो आनंद प्राप्त होत आहे त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही… श्री गणपती बाप्पा मला या कार्यात यश द्या.. भगवान श्री नारायण यांचा निवास माझ्या ह्रदयात आहे.. भगवान श्री शंकराची माझ्यावर कृपा आहे.. सद्गुरूच्या चरणी वंदन करत आहे.. ज्याच्या हृदयात गुरूंचा वास आहे त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो.. हा अंधार नाहीसा झाल्याशिवाय सत्याचे दर्शन होऊ शकत नाही..ब्राम्हणांच्या चरणी वंदन असो.. संत हे स्वतः दुःख सहन करतात परंतु समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात.. म्हणूनच संत हे वंदनीय आहेत.. संत म्हणजे चालते बोलते तीर्थ क्षेत्रच… जो मनुष्य संतांच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते.. याचा फायदा काय तर कावळे देखील कोकिळे प्रमाणे बनतात.. कारण सत्संगाचा महिमाच असा आहे.. स्व उद्धार करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.. सत्संगती ने जसे परीस मुळे लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे आपल्यातील अवगुणांचा ऱ्हास होतो.. आपला उद्धार होतो.. संतांचा महिमा वर्णन करताना सर्वांचीच मती कुंठित होते.. ज्याचा कोणी मित्र नाही , शत्रू नाही.. कुना बाबत मनात किंतु परंतु नाही अश्या संतांच्या चरणी वंदन असो.. संत हे जगाचे हित करण्यासाठी झटत असतात..  अश्या संतांना मी प्रार्थना करतो कि श्री रामचे चरित वर्णन करण्याची शक्ती मला द्या… भक्ती द्या..दुष्ट प्रवृतीना सुद्धा मी वंदन करतो.. त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा दुष्टमधील दुष्ट पणा खरे तर स्वतःचे नुकसानच करतो जसे गारा पडल्याने नुकसान होते पण त्या गारा सुद्धा नंतर स्वतः नष्ट होतात त्या प्रमाणे आपल्यातील दुष्ट पणा आपला नाश अधिक करतो.. संत आणि दुष्ट दोघाच्या चरणी वंदन आहे.. दोघेही लोकांना दुःख देतात.. दुष्ट आपल्या वाईट कर्माने तर संत त्यांच्या वियोगाने लोकांना दुःख देतात.. आपण सर्वानी जे चांगले आहे ते सर्व घ्यावे… आपणास कसा संग  मिळतो त्या प्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून आपण नेहमी सत्संगाची कास धारावी …सर्वांमधील चैतन्याला वंदन असो.. सर्व जीवांना वंदन असो.. प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र अगाध आहे ते वर्णन करण्याची बुद्धी मला प्राप्त होवो.. ज्याप्रमाणे लहान बाळाचे बोल हे आई वडील समजून घेतात तसेच आपण हि माझी वाणी समजून घ्यावी.. हि कथा ऐकून सर्वजण सुखी होतील यात काही शंकां नाही.. मनात कोणतेही तर्क वितर्क ना लावता हि कथा श्रवण करावी तरच ती समजू शकेल.. कोणत्याही गोष्टीला राम नामाशिवाय शोभा नाही.. या मध्ये नेमके काय आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर यात प्रभू श्री रामाचा प्रताप .. महिमा आहे .. प्रभू श्री रामाची कथा हि कल्याण करणारी अशी आहे.. गाईचे दूध हे जसे पोषक असे असते मग ते काळ्या गाईचे असो वा इतर कोणत्याही तसेच प्रभू श्री रामचंद्रांची कथा हे सर्वांना प्रेरणा देणारी अशी आहे.. प्रभू श्री रामाचे चरित्र हे गुणांची खान आहे परंतु ती फक्त इतरांना सांगण्यासाठी आहे का तर नाही ती आपल्या जीवनांत आचारणात आणण्यासाठी आहे.. मी काही कवी नाही नाही वा लेखक हि नाही तरी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे… कारण शास्त्रा नुसार आपण जाणताच भजनाचा महिमा किती अगाध आहे… मग प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र वर्णन करण्याचा मोह मी कसा सोडू… भगवंत एकच आहे.. ज्याला आपण निराकार निर्गुण म्हणत असतो तो वेळोवेळी मनुष्य शरीर धारण करत असतो.. उद्दिष्ट असते जगत कल्याण.. अश्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून प्रभू श्री रामाची कथा आरंभ करत आहे… सुरुवातीला हि कथा व्यास वाल्मिकी यांनी सांगितली आहे… त्यावरच मी वर्णन करत आहे… ज्या सर्व कवींनी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे त्या सर्वांनां वंदन करत आहे… आपण सर्वानी माझ्यावर कृपा करावी.. ज्या वाल्मिक ऋषींनी हि रचना केली त्यांच्या चरण कमलानं वंदन असो.. चारही वेदांना वंदन असो… ब्रम्ह देवांच्या चरणी वंदन असो… श्री गंगा मातेच्या चरणी वंदन असो… श्री शंकर पार्वती… माझे माता पिता यांच्या चरणी वंदन असो… आयोध्या पुरीला वंदन असो.. शरयू नदीला वंदन असो… पर्व दिशेला वंदन असो राजा दशरथ व त्यांच्या राण्यांना वंदन असो… राजा जनकाला हि वंदन असो… राजा भरताच्या चरणी वंदन असो… लक्ष्मणाच्या चरणी वंदन असो… कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण यांना वंदन असो.. हनुमानाच्या चरणी देखील वंदनवानरांचे राजा सुग्रीव , अस्वलांचे राजे जांबवान राक्षस राजे बिभीषण आणि अंगद यांच्या चरणी वंदन… सर्व प्रभू श्री रामाचे उपासक सेवक सर्वांच्या चरणी वंदन.. शुकदेव , सनकादि , नारदमुनी या सर्वांनां वंदन आपण कृपा करा… जानकीमातेच्या चरणी वंदन… श्री सीता रामचंद्रच्या चरणी वंदन .

अश्या प्रकारे तुलसीदासांच्या मंगलाचरण केले आहे.. धन्यवाद तुलसीदास महाराज आपण आम्हाला हे मंगलचरण समजण्याची बुद्धी दिलीत.. असेच आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र समजण्याची बुद्धी द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...