जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

Sep 18, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज म्हणत आहेत… जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी श्री गजानन महाराज यांची महिमा ऐकून एक व्रत घेण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी असे व्रत घेतले कि जर माझे अमुक अमुक काम झाले तर अमुक अमुक वस्तू श्री महाराजांना अर्पण करेल.. त्यांनी अमुक अशी वस्तू अर्पण करण्याचा निर्णय या साठी घेतला होता या मागे कारण असे होते कि ती वस्तू त्यांना फार आवडत होती.. काही दिवसातच त्यांचे काम झाले.. आता व्रताची पूर्ती करण्याचा दिवस आला त्यासाठी शेगांव मध्ये आले… आल्या नंतर त्यांनी पाहिले कि श्री महाराजांच्या दर्शनासाठी तर फारच गर्दी आहे.. त्यांनी विचार केला कि इतक्या गर्दीत माझे दर्शन कसे होणार… आणि इतक्या गर्दीत दर्शन झाले तरी मी जी वस्तू अर्पण करणार आहे ती इतक्या गर्दीत कशी अर्पण करणार.. कारण हि वस्तू पाहूनच लोक मला मारण्यास देखील कमी करणार नाहीत.. त्याच्या मनात हे विचार सुरु होते… त्याच वेळी श्री महाराजांना त्याच्या मनातील विचार समजले.. श्री महाराजांनी तिथे असणाऱ्या एका भक्ताला श्री गोसावी यांना बोलवण्यास सांगितले.. श्री गोसावी नम्रता पूर्वक श्री महाराजांच्या समोर हाथ जोडून उभे राहिले.. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात.. तू आणलेली भेट आम्हाला दे.. जी तीन महिण्यापासून तुझ्या पिशवीत आहे.. श्री महाराजांची हि वाणी ऐकून तो अचंबित झाला… त्याच प्रमाणे श्री महाराज त्यांना म्हणाले ” जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… ! अश्या पद्धतीने योग्य समज देऊन श्री महाराजांनी श्री गोसावी यांच्या व्रताची पूर्ती करून घेतली.. बोला श्री गजानन महाराज कि जय … !

बोला – अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीला तर आपल्या साठी ज्ञानाचा भंडार आहे.. श्री गोसावी यांना समस्या होती ती समस्या सुटण्यासाठी त्यांनी व्रत घेतले.. व्रत असे घेतले कि जे त्यांना आवडत होते… जेव्हा त्यांचे काम होते व व्रत पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा ते घाबरू लागेल… अशीच स्थिती आपली सुद्धा होते… आपणस देखील काही समस्या आली तर आपण सुद्धा काही तर व्रत म्हणा किंवा संकल्प घेतो परंतु तो घेताना देखील आपण आपणस आवडणारा संकल्प घेतो… यातून महाराज सांगत आहेत.. व्रत घ्यायचे असेल तर असे व्रत घ्या ज्यातून आपल्यात जीवनात बदल घडेल.. वास्तविक भगवंताला आपल्याकडून कोणतीच भौतिक वस्तू नको आहे भगवंताची इच्छा आहे कि व्रताला निमित्त करून आपण आपल्यातील वाईट सवयींचा त्याग करून आपले जीवन आनंददायी बनवावे… काही जणांना तर सवयच असते कि काहीही समस्या आली कि लगेचच काही तर व्रत घेतात म्हणजे माझे अमुक काम झाले तर अमुक एखादी वस्तू अर्पण करेल.. खरंतर भगवंत व आपल्यातील नाते हे व्यवहारिक नाते आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.. जर याचे उत्तर नाही असे असेल तर भगवंताला मागायचे असेल तर भक्ती मागा… त्यासाठी कणखर पणा मागा.. त्यावर चालण्याचा संकल्प घ्या… ज्याने ब्रम्हांड निर्माण केले त्याला आपल्याकडून कोणत्याच भौतिक वस्तू नको आहेत.. तो तर म्हणत आहे उच्चतम अभिव्यक्ती कर.. किती खोल असा संदेश श्री महाराज आपणस देत आहेत… !

चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आम्हाला आपल्याकडे काय मागावे याची समज नाही… आजच्या लीलेतून आपण आम्हाला हि समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आम्हाला व्यवहारिक नाही तर आम्हाला तुझी प्रेमळ भक्ती दे… आम्हाला काही मागण्याची नाही तर देण्याची सवय आमच्यात दृढ कर.. आमच्यातील विकार अर्पण करण्याची शक्ती .. समज आम्हाला दे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद .. !

 

 


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...