श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

Aug 31, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया…विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले पाहिजे.. म्हणजेच कायम आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे… म्हणजेच बाप्पा आपणस प्रेरणा देत आहे आहेत कि ज्ञान प्राप्त कर… सुपासारखे कान आपणस प्रेरणा देतात कि ज्या प्रमाणे सुपाने आपण धान्य साफ करतो त्याच प्रमाणे आपणस बाप्पा सांगत आहेत कि तू अश्याच गोष्टी श्रवण कर जेणेकरून तुझे कल्याण होईल.. अश्याच गोष्टींचे श्रवण कर ज्यात सर्वांचे कल्याण भाव असतील.. ज्या श्रवण केले कि आपली चेतनेची पातळी उंचावेल असेच श्रवण करण्यास बाप्पा आपणस सांगत आहेत… एकदंत म्हणजेच भगवंतास आपण एकदंत म्हणतो यातून बाप्पा आपणस सांगत आहेत कि तुझ्या जवळ काय नाही या पेक्षा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी असावे.. पण आपण नेमके उलटे करतो माझ्याकडे काय नाही यावर आपण रडत बसतो बाप्पा सांगतात तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर कर कारण तुला मी जे दिले आहे ते भरपूर आहे त्याचा वापर कर हि प्रेरणा आपणस बाप्पा च्या एकदंत पासून मिळते…बाप्पा चे उदर आपणस प्रेरणा देते कि इतरांच्या चुका आपण कोणत्याही कायम माफ कराव्यात.. कारण आपण इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यावेत व चुका माफ कराव्यात… मोदक बाप्पा ला आवडतात यावरून बाप्पा आपणस सांगत आहेत कि ज्या प्रमाणे मोद म्हणजे आनंद, गोडवा जिव्हाळा हा मोदकात असतो त्या प्रमाणे आपण हि नेहमी आनंदी असावे आपले वर्तन सर्वांशी स्नेहपूर्ण असावे हा बोध आपणस बाप्पा देत आहेत..बाप्पा च्या हातातील परशु आपणस प्रेरणा देतो कि कोणतंही संकट आले तरी भिऊ नका तर त्याला समर्थपणे त्याचा सामना करा कारण संकट काळी आपणस विचाररूपी परशु वापरण्याचा बोध बाप्पा आपणस देत आहेत.. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे… आपणस बोध देतो कि आपण सदैव आपल्या कार्यसाठी तयार असायला हवे.. म्हणजेच चांगल्या कार्याचे वाहक बनण्याचा बोध इथे आपणस प्राप्त होतो.. थोडक्यात बाप्पा ची मूर्ती आपणस आपल्या विकासासाठी प्रेरणा देत आहे… चला तर मग बाप्पा ची सेवा करत करत बाप्पा ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करूया


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...