राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते का हे सर्व..नक्कीच तो मुक्त होईल का जर त्याच्या पोटी जन्म घेणारे भाऊ बहीण माझ्या संपत्ती साठी भांडत आहेत.. खरंच यासाठीच मी कष्ट केले का ? कुठेतरी माझे संस्कार कमी पडले का? अरे बाळांनो भांडू नका रे..माझ्यासाठी तुम्ही दोघेही समानच आहात.. चूक कुणाची हे माझ्यासाठी महत्वाचे नाही…कारण मी तुम्हाला सांभाळताना दुजाभाव केला नाही..पण माझ्या संपत्ती साठी तुम्ही भांडता..थोडीशी जरी तुम्हाला माझा आदर असेल..मला मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर कृपा करून भांडू नका रे..मी तरच मुक्त होईल जर तुम्ही न भांडता राहिलात..नाही ना रे बाळांनो भांडणार..हीच मला श्रद्धांजली असेल..चला या राखी पौर्णिमेस आपले नाते दृढ करूया…!
देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर
देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...